मुख्य सामग्रीवर वगळा

माझं औरंगाबाद: ऐतिहासिक खजिना


माझं औरंगाबाद: ऐतिहासिक खजिना

 | Updated: 20 Feb 2020, 04:00:00 AM

डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात प्रवेश केल्यानंतर डॉ...


माझं औरंगाबाद: ऐतिहासिक खजिना
माझं औरंगाबाद: ऐतिहासिक खजिना
    

Deelip.waghmare@timesgroup.com

deelipwMT

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात प्रवेश केल्यानंतर डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून दोन रस्ते फुटतात. उजवीकडचा रस्ता धरून बॉटनीकल गार्डनपासून पुढे गेल्यानंतर डावीकडे भलीमोठी बाग दिसते. ही बाग इतिहास वस्तुसंग्रहालयाच्या अंगणातच आहे. संग्रहालयाच्या परिसरात प्रवेश करतानाच उजवीकडे शेडमध्ये काही शिल्पं ठेवली आहेत. ही शिल्पं पाहात संग्रहालयात प्रवेश केल्यानंतर खजिनाच सापडतो. हे वस्तुसंग्रहालय म्हणजे विद्यापीठाच्या इतिहास विभागाच्या कर्तृत्वाचे प्रतीक आहे. तत्कालीन नागपूर विद्यापीठ व पुणे येथील डेक्कन कॉलेजसोबत विद्यापीठाने मराठवाड्यात विविध ठिकाणी उत्खनन केले. भोकरदन येथे सापडलेल्या सातवाहन काळातील वस्तू संग्रहालयात आहेत. येथे आठवे शतक ते चौदाव्या शतक या काळातील शिल्पाकृती ठेवलेल्या आहेत. इसवी सनपूर्व ६०० ते ब्रिटिशकाळ असा काळाचा मोठा पट मांडणारा नाण्यांचा संग्रह थक्क करणारा आहे. मोगल, यादव, म्हैसूर, मराठा आदी वेगवेगळ्या कालखंडातील नाणी येथे आहेत. सुवर्ण नाणीही पाहता येतात. मराठा व मोगलकालीन शस्त्रे येथे मांडली आहेत. विविध प्रकारच्या तलवारी, बंदुकी, दांडपट्टा, चिलखत, कासव ढाल, भाले आदी शस्त्रे आहेत. हस्तीदंती कलाकृती, रेशमी वस्त्रे, मध्ययुगीन तोफ, संत एकनाथांच्या वाड्यातील लाकडी देव्हारा, मध्ययुगीन आंतरराष्ट्रीय व्यापारावर प्रकाश टाकणारी हस्तीदंती बाहुली संग्रहालयात आहे, पण ती क्वचितच पाहावयास मिळते. हा खजिना प्रत्येक औरंगाबादकरांनी एकदातरी वेळ काढून पाहिलाच पाहिजे. हे संग्रहालय पाहण्यासाठी नाममात्र तिकीट आहे. संग्रहालय सार्वजनिक सुट्या, दुसरा व चौथा शनिवार आणि रविवार वगळता वर्षाचे सर्व दिवस खुले असते.

\Bछत्रपती संभाजी महाराजांचे दुर्मिळ चित्र \B

वस्तुसंग्रहालयातील मध्ययुगीन लघुचित्रांचा संग्रह पाहण्यासारखा आहे. शालेय पाठ्यपुस्तकात अधिकृतपणे वापरले जाणारे छत्रपती संभाजी महाराजांचे चित्र येथे आहे. अहमदनगरच्या निजामशाहीचा वजीर व औरंगाबाद शहराचा संस्थापक मलिक अंबर यांची तीनच चित्रे जगात उपलब्ध आहेत. त्यापैकी एक येथे आहे. याशिवाय सम्राट अकबर यांच्यासह मराठा, राजपूत, मुगलकालीन जीवन दर्शन घडविणारी मनमोहक चित्रे पाहताना भान हरपून जाते.

\Bमोडी कागदपत्रे\B

मोडी कागदपत्रांचा संग्रह हे वस्तुसंग्रहालयाचे खास वैशिष्ट आहे. येथे १७ हजारांपेक्षा जास्त मोडी कागदपत्रे असून त्यांचे सूचीकरण व वाचन करण्यात येत आहे. या संशोधनातून मध्ययुगीन कालखंडावर प्रकाश पडू शकतो.

\Bमणी, भांडी, दैनंदिन वापराच्या वस्तू\B

भोकरदन व तेर येथील उत्खननात इ. स. पूर्व ३०० ते २०० दरम्यानचे अवशेष सापडले. मौल्यवान दगड, मणी, भाजलेल्या मातीची भांडी, मूर्ती, दैनंदिन वापराच्या वस्तू, हस्तीदंती शिल्प येथे मांडली आहेत. शिवाय दौलताबाद किल्ल्याच्या पायथ्याशी केलेल्या उत्खननात सापडलेली मध्ययुगीन काळातील अवजारे, बाणाचे टोक, चाकू, खिळे, कुलपाची चावी आदी वस्तू पाहता येतात. त्या काळातील सरदारांच्या शिक्क्यांचा संग्रहही लक्षणीय आहे.

\Bडॉ. गुप्ते यांचे योगदान \B

विद्यापीठाचे तत्कालीन विभागप्रमुख रमेश शंकर गुप्ते यांनी दुर्मिळ वस्तूंचा संग्रह केला. कालांतराने वस्तुंची संख्या वाढल्यानंतर २९ ऑक्टोबर १९८५ रोजी सध्याच्या इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. विशेषत: रावबहादूर पारसनीस, सरदार नाईक बावणे, डॉ. एस. बी. देशमुख यांच्याकडून बहुमोल खजिना प्राप्त झाला. या सर्वांच्या प्रयत्नातून हे संग्रहालय आकारास आले आहे.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उस्मानाबाद की धाराशीव? या शहराचं नाव आलं कुठून?

उस्मानाबाद की धाराशीव? या शहराचं नाव आलं कुठून? प्रणाली येंगडे बीबीसी मराठीसाठी 17 जानेवारी 2021 अपडेटेड 18 जानेवारी 2021 फोटो स्रोत, GETTY IMAGES फोटो कॅप्शन, मीर उस्मान अली खान मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवरून उस्मानाबादचा "धाराशीव" असा उल्लेख झाल्यानं नामांतराचा मुद्दा परत चर्चेत आला आहे. अशावेळी या शहराच्या नावाचा इतिहास आणि त्यामागील राजकारण याविषयी घेतलेला हा संक्षिप्त आढावा. धाराशीव  नावाचा इतिहास धाराशीव या उस्मानाबादच्या पूर्वीच्या नावाविषयी अनेक कथा सांगितल्या जातात. स्कंद पुराणातील एका कथेनुसार, पूर्वी या गावात धारासूर नावाचा एक असुर (राक्षस) राहत असे. त्याच्या नावावरून गावाचे नाव धारासूर म्हणून ओळखले जायचे. धारासूरानं शंकराची आराधना करून प्रचंड शक्तीचं वरदान मिळवलं. त्यानंतर उन्मत्त होऊन त्याने लोकांना त्रास द्यायला सुरवात केली. जेव्हा सरस्वती देवीनं धारासूराचा वध केला तेव्हा तिचं नाव 'धारासुरमर्दिनी' झालं. अशाप्रकारे तिच्या नावावरूनच गावाचं नाव धाराशिव पडल्याची आख्यायिका आहे. औरंगाबादचं नाव आजवर कितीवेळा बदललंय हे तुम्हाला माहिती आहे का? औरंगाब...

अंबाजोगाईत निजाम सरकारच्या खाणाखुणा

नजरिया Home इतिहास अंबाजोगाईत निजाम सरकारच्या खाणाखुणा   Sep 16, 2018 अं बाजोगाई शहराला तसे फार मोठे ऐतिहासिक महत्त्व आहे. पूर्वी हा भाग निजाम संस्थानात असलेल्या हैदराबाद संस्थानात यायचा. त्यावेळी मराठवाडा विभागाला  ‘ मराठवाडी ’  असं  म्हटलं जायचं. हैदराबाद संस्थान काळात अंबाजोगाई शहराला जिल्हयाचा दर्जा होता.  सन १८६०-१९०० या चाळीस वर्षांच्या काळात या शहरात बऱ्याच ऐतिहासिक वास्तू निर्माण झाल्या. यापैकी अनेक देखण्या वास्तू शंभरी पार करुन आजही दिमाखात उभ्या आहेत. अनेक जुन्या वास्तूंच्या ठिकाणी त्याच कार्यालयाच्या नव्या देखण्या इमारती उभ्या आहेत.  मराठवाडा विभागातील जवळपास सर्वच गावात हे चित्र आहे. मात्र ,  अंबाजोगाई त्याकाळी जिल्हा व निजाम सरकारच्या सैन्यदलाचं मुख्य केंद्र होतं. या शहारात निजाम राजवटीतील अनेक वास्तू ,  समाध्या ,  मंदीरे ,  मस्जिद ,  ख्रिश्चन स्मशानभूमी ,  सैन्यदलाची बंकरे अशा अनेक खुणा मराठवाडा मुक्ती संग्रामापूर्वीची साक्ष देत उभ्या आहेत. या ऐतिहासिक वास्तुंचे जतन होण्याची गरज आहे. अंबाजोगाई शहरावर आणि हैदर...

केदारेश्वर मंदिर, धर्मापुरी

केदारेश्वर मंदिर, धर्मापुरी केदारेश्वर मंदिर  हे  महाराष्ट्रातील   बीड जिल्ह्यातील   धर्मापुरी गावाजवळ असलेले मध्ययुगीन  शिवमंदिर  आहे. याचे स्थापत्य  चालुक्य शैलीत  केले आहे. आरंभ  मराठवाडा  परिसर प्राचीन  शिल्प स्थापत्य  अवशेषांनी समृध्द आहे. प्राचीन ऐतिहासिक पुराव्यांचा विचार करत असताना मराठवाड्याला वगळून चालतच नाही. आजही अशा अनेक ऐतिहासिक खाणाखुणा जागोजागी सर्व मराठवाडाभर उभ्या आहेत.  सातवाहनांपासून   यादव  काळापर्यंत येथे अनेक शिल्पस्थापत्य रचना उदयास आल्या. मराठवाड्यावर सर्वप्रथम राज्य सातवाहनांनी केले. प्रतिष्ठाननगरी  ही त्यांची राजधानी होती.  वेरुळच्या कातळातून अखंड काव्य निर्माण करणारा सर्वश्रेष्ठ कलाकार कोकस हा या प्रतिष्ठानचाच. तर या प्रतिष्ठानवर इ.स.पूर्व २३५ पासून ते इ.स. २२५ असे सुमारे साडेचारशे वर्ष सातवाहनोनी राज्य केले. त्यानंतर या मराठवाड्यात इ.स. २२५ ते ५५० असे सुमारे तीनशे वर्ष  वाकाटकांनी  राज्य केले. त्यानंतर इथे बदामीच्या चालुक्यांची सत्ता निर्माण झाली. ती सुमारे दोनशे व...