मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

डिसेंबर, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

खडर्याच्या लढाईविषयी माहिती आहे का?

मूलतः उत्तर दिले: खडर्याची लढाईविषयी माहिती आहे काय? मराठ्यांच्या इतिहासात ज्या प्रसिद्ध लढाया झाल्या, त्यात खर्ड्याची लढाई ही प्रसिद्ध आहे . हि लढाई मार्च १७९५ मध्ये खर्डा ता . जामखेड जि . अहमदनगर येथे मराठे व निजाम यांच्यामध्ये झाली. खर्ड्याच्या लढाईची थोडक्यात पार्श्वभूमी अशी , मराठेशाहीतील मातब्बर सरदार महादजी शिंदे ,हरीपंत फडके इ सरदार हे कालवश झालेले होते . त्यातच माधवराव नारायण पेशवे हे अल्पवयीन असून , नाना फडणवीस हे कारभार पाहत होते. हैदराबादचा निजामाचा दिवाण मुशृलमूलुख ऊर्फ मैनातदौला याने निजामास पेशवा लहान असुन स्वारी केली तर पेशव्याचे राज्य हाती येइल किंवा मोठी खंडणी वसुल करता येइल असा सल्ला दिला , त्यावरून निजाम तयार होवून लाखभर फौज जमा करून तो निघाला. पेशव्यांचा वकील गोविंदराव काळे यांच्यामार्फत पुण्यास आम्हांस खंडणी द्यावी अन्यथा लढाईस तयार राहावे, असा निरोप दिला . त्यानुसार पेशव्यांनी देखील समरांगणी दोन हात होतील मगच खंडणी द्यावयाची असल्यास देवु , असा जवाब पाठवून शिंदे , होळकर, भोसले ,परशुरामभाऊ यांची फौज व पानसे यांचा तोफखाना घेऊन पेशवे पुण्यावरुन कोरेगाव , काष्टी त...

मराठ्यांच्या विजयी शौर्यगाथा लढाईला २२३ वर्षे पूर्ण

खर्डा किल्ला : मराठ्यांच्या विजयी शौर्यगाथा लढाईला २२३ वर्षे पूर्ण By  लोकमत न्यूज नेटवर्क  | Published:  March 11, 2018 1:06 PM इतिहास प्रसिद्ध खर्ड्याची लढाई ११ मार्च १७९५ रोजी सुरू झाली. मराठ्यांची अखेरची विजयी शौर्यगाथा म्हणून ओळखल्या जाणा-या या लढाईला इतिहासात महत्त्व आहे. २२३ वर्षांच्या विजयाची परंपरा असलेला ऐतिहासिक दुर्ग खर्डा नगरीत आजही प्रेरणा देत आहे. खर्डा किल्ला : मराठ्यांच्या विजयी शौर्यगाथा लढाईला २२३ वर्षे पूर्ण संतोष थोरातखर्डा : इतिहास प्रसिद्ध खर्ड्याची लढाई ११ मार्च १७९५ रोजी सुरू झाली. मराठ्यांची अखेरची विजयी शौर्यगाथा म्हणून ओळखल्या जाणा-या या लढाईला इतिहासात महत्त्व आहे. २२३ वर्षांच्या विजयाची परंपरा असलेला ऐतिहासिक दुर्ग खर्डा नगरीत आजही प्रेरणा देत आहे.अनेक ऐतिहासिक पोवाडे व विस्तृत प्रमाणातील वाङ्मयातून खर्डा लढाईचे ऐतिहासिक महत्त्व विषद केले आहे. अनेक ऐतिहासिक पुस्तकांचे प्रसिद्ध लेखक व प्रसिद्ध इतिहास अभ्यासक गो. स. सरदेसाई यांच्या मराठी रियासत उत्तर विभाग-२ या पुस्तकात खर्डा येथील संग्रमाबद्दल लिहिताना ते म्हणतात, पानिपतच्या संहाराचा चटका महार...

खर्डा येथे लढाई कशी झाली होती? त्यामुळे देशावर काय परिणाम झाला?

दसरा स्वराज्य ध्वज: खर्डा येथे लढाई कशी झाली होती? त्यामुळे देशावर काय परिणाम झाला? तुषार कुलकर्णी बीबीसी मराठी 15 ऑक्टोबर 2021 फोटो स्रोत, ROHIT PAWAR/FACEBOOKPAGE फोटो कॅप्शन, रोहित पवार 'शत्रूच्या दिशेनी (मराठ्यांच्या दिशेनी) एक रॉकेट आले आणि त्याने वझीर खानाला टिपले. त्यात निजामाचा सरदार वझीर खानाचा मृत्यू झाला,' असं वर्णन एक इंग्रज अधिकारी आपल्या वरिष्ठ सहकाऱ्याला लढाईचा वृत्तांत सांगताना करतो. खर्ड्यात जी लढाई झाली होती त्यामध्ये केवळ अग्निबाणच नाही तर मोठ्या प्रमाणात दारूगोळ्याचा वापर करण्यात आला होता. 'मराठ्यांना खंडणी का द्यावी त्यापेक्षा हा पैसा आपण युद्धावर खर्च करू' असं म्हणणारा निजामाचा पंतप्रधान लढाईत पराभूतच नाही तर बंदिवान देखील झाला. 11 मार्च 1795 ला झालेल्या ही लढाई मराठा साम्राज्याची शेवटची यशस्वी लढाई म्हणून ओळखली जाते. तात्या टोपेंचा मृत्यू होऊन 4 वर्षं झाल्यानंतरही ब्रिटीशांच्या मनात शंका का होती? नारायणराव पेशव्यांची हत्या : आनंदीबाईंनी खरंच 'ध' चा 'मा' केला होता का? नाना फडणवीस कोण होते? ते नसते तर मराठा साम्राज्याचं काय झालं असतं...

खर्ड्याची लढाई

खर्ड्याची लढाई खर्ड्याची लढाई खर्ड्याची लढाई मराठे आणि निजामुल्मुल्क यांच्यात ११ मार्च १७९५ रोजी झालेली महत्त्वपूर्ण लढाई. मराठ्यांच्या इतिहासात नाना फडणीसाच्या कर्तृत्वाचा परमोच्च बिंदू म्हणजे खर्ड्याची लढाई होय. १७२४ मध्ये निजामुल्मुल्काने स्थापलेली हैदराबादची आसफशाही व मराठेशाही ह्या दोन्हीही स‌त्ता दक्षिणेत आपले आसन स्थिर करीत होत्या. निजाम केवळ दक्षिणेत आणि मराठे उत्तरेत व दक्षिणेत आपले राज्य वाढवू पाहत होते. त्यामुळे स‌मान ध्येयाने प्रेरित झालेल्या या दोन स‌त्तांमधील अनिवार्य संघर्षाचा खर्ड्याची लढाई हा शेवटचा टप्पा होय. म राठ्यांना दक्षिणेतील स‌हा सुभ्यांचे चौथाई व स‌रदेशमुखी वसुलीचे अधिकार १७१८ मध्ये मिळाले. निजाम आपल्या ताब्यातील प्रदेशाची चौथाई आणि स‌रदेशमुखी मराठ्यांना सुखासुखी देत नव्हता. मराठ्यांनी वेळोवेळी युद्धांत निजामाचा पराभव करून हे देणे त्याच्यावर बसविले होते आणि संधी मिळताच प्रत्येक वेळी निजाम ते देण्याची टाळाटाळ करत होता. ही चौथाईची बाकी जवळजवळ तीन कोट रुपये झाल्याने मराठ्यांना युद्धाव्यतिरिक्त दुसरा मार्ग नव्हता. ना ना फडणीस निजामशाही आपल्या ताब्यात ठेवण्याचे प्र...

खर्ड्याची लढाई

खर्ड्याची लढाई इतर भाषांत वाचा Download PDF पहारा संपादन करा खर्ड्याची लढाई दिनांक फेब्रुवारी - मार्च   इ.स. १७९५ स्थान खर्डा  ता.  जामखेड  जि.  अहमदनगर परिणती मराठ्यांचा  विजय [१] खर्ड्याचा तह युद्धमान पक्ष मराठा साम्राज्य   हैदराबादचा निजाम सेनापती   सवाई माधवराव पेशवे   दौलतराव शिंदे   तुकोजी होळकर  दुसरा रघुजी भोसले   निजाम उल मुल्क खर्ड्याची लढाई  ही  मराठे  व  हैदराबादचा निजाम  यांच्यात  फेब्रुवारी - मार्च ,  इ.स. १७९५  साली  भारतातील   महाराष्ट्र राज्याच्या  अहमदनगर जिल्ह्यातील   खर्डा  येथे झालेली एक लढाई होती. या लढाईत मराठ्यांच्या संयुक्त फौजांनी हैदराबादच्या  निजामाचा  पराभव केला. पार्श्वभूमी संपादन करा महादजी शिंदेचा वारस दौलतराव शिंदे याच्याशी  नाना फडणवीसाचे  संबंध सुधारलेले होते आणि  शिंद्याची  विशाल सेना  पुणे  येथे असल्याने त्याचा फायदा घेऊन मराठा सत्तेचा प्रभाव दक्षिणेत वाढविण्याचे नानाने ठरविले आणि हैदराबा...

नांदेड जिल्हा – एक दृष्टीक्षेप

नांदेड जिल्हा – एक दृष्टीक्षेप महाराष्ट्र राज्यात दक्षिण टोकाला तेलंगाणा राज्याच्या सीमेलगत नांदेड जिल्हा वसलेला आहे. “नांदेड” या नावाचा उगम “नंदी-तट” या शब्दामधून झालेला असून, “नंदी” म्हणजे भगवान श्री शंकराचे वाहन आहे आणि “तट” म्हणजे पवित्र गोदावरी नदीचा काठ, नंदीने गोदावरी नदीच्या किनार-यावर तपस्या केली असल्याची आख्यायिका आहे. आज नांदेड जिल्हा हुजूर साहेब नांदेड या नावाने प्रख्यात झाला आहे, शीख धर्माचे गुरु श्री गुरु गोविंद सिंघजी महाराज यांनी सन १७०५ मध्ये या ठिकाणी आपला देह ठेवला. नांदेड हे सन १७२५ मध्ये हैद्राबाद संस्थानाचा हिस्सा झाले आणि १९४७ नंतर भारताच्या स्वातत्र्यानंतरही निजाम संस्थाने आपले स्वतंत्र अस्तित्व राखल्याने नांदेड हैद्राबाद संस्थानाचाच हिस्सा बनून राहीले. हैद्राबाद संस्थानाविरुद्ध केलेल्या भारत सरकारच्या पोलीस कारावाईनंतर १७ सप्टेंबर १९४८ रोजी हैदराबाद संस्थान स्वतंत्र भारत देशात समाविष्ट झाले.     प्राचीन राजवंश : इसवीसन पुर्व सहाव्या शतकाच्या सुमारास महाराष्ट्रातील विविध प्रदेश अश्मक, कुंतल, मलक, अपरांता, ऋषिक नावाने संबोधिले जाऊ लागले. नांदेड भोवतीच्या...