मराठवाड्यातील सात किल्ल्यांचे लवकरच पालटणार रूप 5 वर्षांपूर्वी औरंगाबाद - गडकिल्ल्यांच्या देशा, महाराष्ट्र देशा, असे म्हटले जात असले तरी मराठवाड्यातील किल्ल्यांच्या नशिबी कायमच सापत्न वागणूक आली आहे. मात्र, शासनाने स्थापन केलेल्या गड संवर्धन समितीच्या प्रयत्नांमुळे मराठवाड्यातील किल्ल्यांचे रूप पालटणार असून सहा किल्ल्यांच्या संवर्धनाचे काम सुरू झाले आहे. यावर्षी यात आणखी एका किल्ल्याची भर पडली आहे. गेल्या दोन वर्षांत संवर्धनाच्या कार्यक्रमात समाविष्ट केलेल्या राज्यातील ३० किल्ल्यांपैकी मराठवाड्यातील आहेत, हे विशेष. सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी गडकिल्ल्यांचे संरक्षण आणि संवर्धनासाठी तज्ज्ञांची समिती गठित केली. तावडे समितीचे अध्यक्ष असून ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ पांडुरंग बलकवडे प्रमुख मार्गदर्शक आहेत. महिन्यातून एकदा सर्व सदस्यांची बैठक होते. बैठकीतील निर्णयांवर तीन महिन्यांनी शिक्कामोर्तब केले जाते. दोन वर्षांत समितीने राज्यातील किल्ल्यांचे संवर्धन करण्याची योजना आखली आहे. यात मराठवाड्याला झुकते माप मिळाले आहे. ३०पैकी किल्ले मराठवाड्यातील : दुर्गसंवर्धन समितीने गेल्या दोन वर्षां...
वैभवशाली राजवाडा - माझा मराठवाडा