मुख्य सामग्रीवर वगळा

पाथरुडचा इतिहास माहीत आहे?

पाथरूड या आपल्या गावाचा तुम्हाला अभिमान वाटतो ना? तुम्हाला पाथरुडचा  इतिहास माहीत आहे? मग गावचा इतिहास जाणून घेण्यासाठी  खलील संपूर्ण लेख  शेवट पर्यंत वाचा
पाथरूड भूम तालुक्यातील महत्वाचे गाव आहे.महाराष्ट्रातील  सर्वात मोठ्या प्रमाणात पेढा निर्मिती आणि व्यवसाय करणारे गाव.पेढ्याच्या व्यवसायामुळे महाराष्ट्र , मध्य भारत आणि दक्षिण भारतात व्यावसायिक संबंध असलेले बहुधा देशातील एकमेव गाव.सोलापूर -  शिर्डी महामार्गावर वसलेले पाथरूड हे गाव स्वयंपूर्ण खेडे आहे , या गावाच्या प्राचीन काळाची साक्ष देणारे येथील हेमाडपंथी महादेव मंदिर , अष्टविनायका प्रमाणे मोठ्या आकाराच्या गणपतीचे मंदिर अनेक आख्यायिका असलेले जागृत हनुमान मंदिर  , अलीकडच्या काळात विकसित झालेले वैद्यनाथ म्हणजे वैजुबा मंदिर व तेथील नाथपंथीय स्थान . तेरा खेडे व चौदावे पाथरूड आठवडी बाजाराचे स्वयंपूर्ण गाव म्हणजे पाथरूड .पूर्वीच्या काळी ब्रिटिश आणि हैद्राबाद संस्थानच्या सीमेवरील महत्वाचे गाव. पाथरुडच्या शिवे शेजारी ईट रोडवरील कालावंतिणीचा महाल नावाची प्राचीन वास्तू ऐतिहासिक गूढ आहे आणि त्याचा नक्कीच पाथरूडच्या इतिहासाशी संबंध असावा . सर्वप्रथम आपण पाथरूड या गावाच्या नावाच्या संबंधात विचार करू , तेर - तुळजापूर - बार्शी  - परांडा ते बीड - पैठण या प्राचीन नगराशी जोडणाऱ्या रस्त्यावर पाथरूड वसले आहे , अलीकडच्या काळातील परांडा बीड मार्ग पाथरूड वरून जातो ,पाथ म्हणजे रस्ता आणि रुड किंवा रूढ म्हणजे परंपरा  म्हणजे या गावातून जाणार रस्ता रूढी परंपरे प्रमाणे हजारो वर्षांपासून सर्वांच्या परिचयाचा व वळणाचा म्हणून पाथरूड या नावा विषयी निश्चित तर्क करण्यास हरकत नसावी.  फार प्राचीन काळातील इतिहास आज उपलब्ध नाही परंतु निजाम राजवटीतील रझाकार काळातील  दोन घटना पाथरुडच्या इतिहासातील ऐतिहासिक घटना म्हणून नोंद घ्याव्यात आशा आहेत .
1. बीडच्या फौजदाराला  धडा  शिकवला :- साधारणतः 1944 सालाची ही घटना असावी .याकूब अमीन नावाचा बीडचा फौजदार होता .त्याचा स्वतःचा विवाह आटोपून परांड्यातून बीड ला पाथरूड मार्गे जात होता.त्याने आपले वऱ्हाड आताच्या साईबाबा मंदिराच्या मार्गे म्हणजे पूर्वीच्या पानदी मार्गे रवाना करून तो गावात काही साथीदारांसह शिरला त्या काळी हनुमान मंदिरा जवळ गणपतराव पवार(रिटायर्ड जज श्री.बाबूराव पवारांचे वडील) यांचे किराणा दुकान होते.दुकानात गणपतराव नव्हते पण  तेथे काम करणारे माणिक माळी दुकानात होते . फौजदार दुकानात शिरला व सिगारेटची मागणी केली .माणिक माळी यांनी  एक सिगारेट दिली पण फौजदाराला याचा राग आला तो म्हणाला "एक सिगारेट देतोस काय?मला ओळखले नाहीस?" म्हणून माणिक माळी यांच्या दोन थोबाडीत मारल्या व त्यास शिवीगाळ करू लागला .फौजदाराच्या आवाजा मुळे अनेक गावकरी जमा झाले .गावकरी जमा झालेले पाहून फौजदार आणखीनच चेकाळून गावकऱ्यांना शिव्या देवू लागला . आंबू तेली(देशमाने) व अर्जुन बोराडे(दिलीप गौतम बोराडेचे चुलत आजोबा) हे धाडशी तरुण फौजदाराला जाब विचारायला पुढे आले .मस्तवाल फौजदाराने कमरेच्या म्यांनातून  तलवार काढली व पहिल्यांदा अर्जुन बोराडे याच्या वर वार केला त्याच्या कपाळावर वर्मी घाव लागला  सर्वांग रक्ताने माखले .त्यांच्या पाठोपाठ धावून आलेल्या  आंबू तेल्याला खाली पाडून त्याच्या नरडीचा तलवार लावली.बलदंड आंबू तेल्याने तलवारीचे पाते धरले व धारदार पाते हाताने पिळले व फौजदाराची तलवार खाली पडली दोन्ही हात चांगलेच कापले पण नारड्यावरची तलवार बाजूला सारण्यात यश आले . मग मात्र गावकरी चिडले व त्यांनी फौजदाराला बेदम चोप दिला  .तेवढ्यात गुमस्ता (पोलीस पाटलाचे सहकारी) धारप्पा वाणी हे येस्कर व रामोशा सह घटना स्थळी  पोहचले .फौजदाराला गावकऱ्यांच्या तावडीतून सोडवले .फौजदार खूप चिडला होता गावकरीही संतप्त होते  ,आजू बाजूच्या माळ वदावरून दगड आणि गोफण घेऊन बायका पोर सज्ज होती.वातावरण तापले होते फौजदाराला जिवंत सोडायच नाही असा पण गावकऱ्यांनी केला होता पण फरशी कुऱ्हाडी हातात घेतलेले रामोशी गावकाऱ्याला मागे हटवीत होते .धारप्पा गावकऱ्यांना शांत करीत होते . फौजदार रामोशी येस्कारांना शिव्या घालू लागला. तेवढ्यात भूम पोलीस स्टेशन मधून फौजदार व पोलीस कुमक पोहचली  भूमच्या फौजदाराने सर्व वृतांत समजून घेतला व बीडच्या फौजदार व काही गावकऱ्यांना अटक करून परांड्याला घेऊन गेले त्याकाळी परांड्याला कोर्ट होते .त्या नंतर बरेच दिवस तारखा चालू होत्या अक्षरशः सारे गाव तारखेला हजर राहत असे कोर्टाने गावकऱ्यांच्या बाजूने निकाल दिला.पुढील कालखंडात या घटनेनंतर रझाकार काळात  रझाकारही पाथरूड मध्ये शिरायला घाबरत.
पाथरुडच्या अत्याचारी  रझाकार  कोतवालाचा वध ही दुसरी घटना पुढील भागात . क्रमशः

--  हेमकांत अशोकराव महामुनी

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उस्मानाबाद की धाराशीव? या शहराचं नाव आलं कुठून?

उस्मानाबाद की धाराशीव? या शहराचं नाव आलं कुठून? प्रणाली येंगडे बीबीसी मराठीसाठी 17 जानेवारी 2021 अपडेटेड 18 जानेवारी 2021 फोटो स्रोत, GETTY IMAGES फोटो कॅप्शन, मीर उस्मान अली खान मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवरून उस्मानाबादचा "धाराशीव" असा उल्लेख झाल्यानं नामांतराचा मुद्दा परत चर्चेत आला आहे. अशावेळी या शहराच्या नावाचा इतिहास आणि त्यामागील राजकारण याविषयी घेतलेला हा संक्षिप्त आढावा. धाराशीव  नावाचा इतिहास धाराशीव या उस्मानाबादच्या पूर्वीच्या नावाविषयी अनेक कथा सांगितल्या जातात. स्कंद पुराणातील एका कथेनुसार, पूर्वी या गावात धारासूर नावाचा एक असुर (राक्षस) राहत असे. त्याच्या नावावरून गावाचे नाव धारासूर म्हणून ओळखले जायचे. धारासूरानं शंकराची आराधना करून प्रचंड शक्तीचं वरदान मिळवलं. त्यानंतर उन्मत्त होऊन त्याने लोकांना त्रास द्यायला सुरवात केली. जेव्हा सरस्वती देवीनं धारासूराचा वध केला तेव्हा तिचं नाव 'धारासुरमर्दिनी' झालं. अशाप्रकारे तिच्या नावावरूनच गावाचं नाव धाराशिव पडल्याची आख्यायिका आहे. औरंगाबादचं नाव आजवर कितीवेळा बदललंय हे तुम्हाला माहिती आहे का? औरंगाब...

अंबाजोगाईत निजाम सरकारच्या खाणाखुणा

नजरिया Home इतिहास अंबाजोगाईत निजाम सरकारच्या खाणाखुणा   Sep 16, 2018 अं बाजोगाई शहराला तसे फार मोठे ऐतिहासिक महत्त्व आहे. पूर्वी हा भाग निजाम संस्थानात असलेल्या हैदराबाद संस्थानात यायचा. त्यावेळी मराठवाडा विभागाला  ‘ मराठवाडी ’  असं  म्हटलं जायचं. हैदराबाद संस्थान काळात अंबाजोगाई शहराला जिल्हयाचा दर्जा होता.  सन १८६०-१९०० या चाळीस वर्षांच्या काळात या शहरात बऱ्याच ऐतिहासिक वास्तू निर्माण झाल्या. यापैकी अनेक देखण्या वास्तू शंभरी पार करुन आजही दिमाखात उभ्या आहेत. अनेक जुन्या वास्तूंच्या ठिकाणी त्याच कार्यालयाच्या नव्या देखण्या इमारती उभ्या आहेत.  मराठवाडा विभागातील जवळपास सर्वच गावात हे चित्र आहे. मात्र ,  अंबाजोगाई त्याकाळी जिल्हा व निजाम सरकारच्या सैन्यदलाचं मुख्य केंद्र होतं. या शहारात निजाम राजवटीतील अनेक वास्तू ,  समाध्या ,  मंदीरे ,  मस्जिद ,  ख्रिश्चन स्मशानभूमी ,  सैन्यदलाची बंकरे अशा अनेक खुणा मराठवाडा मुक्ती संग्रामापूर्वीची साक्ष देत उभ्या आहेत. या ऐतिहासिक वास्तुंचे जतन होण्याची गरज आहे. अंबाजोगाई शहरावर आणि हैदर...

केदारेश्वर मंदिर, धर्मापुरी

केदारेश्वर मंदिर, धर्मापुरी केदारेश्वर मंदिर  हे  महाराष्ट्रातील   बीड जिल्ह्यातील   धर्मापुरी गावाजवळ असलेले मध्ययुगीन  शिवमंदिर  आहे. याचे स्थापत्य  चालुक्य शैलीत  केले आहे. आरंभ  मराठवाडा  परिसर प्राचीन  शिल्प स्थापत्य  अवशेषांनी समृध्द आहे. प्राचीन ऐतिहासिक पुराव्यांचा विचार करत असताना मराठवाड्याला वगळून चालतच नाही. आजही अशा अनेक ऐतिहासिक खाणाखुणा जागोजागी सर्व मराठवाडाभर उभ्या आहेत.  सातवाहनांपासून   यादव  काळापर्यंत येथे अनेक शिल्पस्थापत्य रचना उदयास आल्या. मराठवाड्यावर सर्वप्रथम राज्य सातवाहनांनी केले. प्रतिष्ठाननगरी  ही त्यांची राजधानी होती.  वेरुळच्या कातळातून अखंड काव्य निर्माण करणारा सर्वश्रेष्ठ कलाकार कोकस हा या प्रतिष्ठानचाच. तर या प्रतिष्ठानवर इ.स.पूर्व २३५ पासून ते इ.स. २२५ असे सुमारे साडेचारशे वर्ष सातवाहनोनी राज्य केले. त्यानंतर या मराठवाड्यात इ.स. २२५ ते ५५० असे सुमारे तीनशे वर्ष  वाकाटकांनी  राज्य केले. त्यानंतर इथे बदामीच्या चालुक्यांची सत्ता निर्माण झाली. ती सुमारे दोनशे व...