मुख्य सामग्रीवर वगळा

हेरिटेज व्हिलेज : चारठाण्यातील प्राचीन मंदिरांसाठी सरसावले इतिहासप्रेमी

हेरिटेज व्हिलेज : चारठाण्यातील प्राचीन मंदिरांसाठी सरसावले इतिहासप्रेमी
गुरुवार, 9 जानेवारी 2020

गावात सुंदर तीन मजली लाकडी वाडे आहेत. हे जूने वाडे वास्तुशास्त्राचे उत्कृष्ठ असे नमुने आहेत. खासगी मालकीचे हे वाडे डागडुजी करून त्यांचे जतन करण्याची नितांत आवश्यकता आहे. यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.


example

औरंगाबाद : परभणी जिल्ह्यातील चारठाणा (ता. जिंतूर) येथे हेमांडपंथी मंदिरांसह साडेतीनशेहून अधिक मंदिरे असण्याची शक्यता इतिहासतज्ज्ञांकडून वर्तविण्यात येते. मात्र, या मंदिराच्या संवर्द्धनासह इतर मंदिरासाठी काहीही केले जात नाही. स्थानिक प्रशासन, राज्य व केंद्राने या गावाकडे लक्ष दिल्यास जगविख्यात पर्यटनस्थळ म्हणून उदयास येऊ शकते.

चारठाणा गावाला हेरिटेज व्हिलेजचा दर्जा देण्यासह पायाभूत सुविधांचा विकास करावा या मागणीसाठी १२ जानेवारीपासून ‘सांस्कृतिक जागृती अभियान’ राबविण्यात येणार आहे. यासंदर्भात औरंगाबाद येथे चारठाणा येथील ग्रामस्थांची गुरुवारी (ता. ९) बैठक पार पडली.


Image result for charthana temple

मराठवाडा ही प्राचीन संस्कृतीचे संपन्न असे वैभव सांगणारी भूमी आहे. महाराष्ट्राचे  आद्य आणि सर्वात दीर्घकाळ टीकलेल्या सातवाहन घराण्याची ही भूमी. सातवाहन, वाकाटक, कलचुरी, चालुक्य, राष्ट्रकुट आणि यादव राज्यांच्या काळातील कितीतरी समृद्ध संपन्न पुरातत्वीय पुरावे इथे आढळतात. यातीलच एक यादवांच्या काळातील (11 वे ते 13 शतक) 365 मंदिरे असलेले गाव म्हणजे औरंगाबाद-जालना-जिंतूर रस्त्यावरील चारठाणा (ता. जिंतूर, जि. परभणी).

Image result for charthana temple

आयोजकांनी सांगितले की, या गावातील संपन्न सांस्कृतिक पुरातत्त्वीय वारसा समोर यावा, त्यावर संशोधन व्हावे, या परिसरात अजून उत्खनन व्हावे, सर्वांग परिपूर्ण असा अभ्यास या गावाचा व्हावा, या वारश्याबाबत जागृती निर्माण व्हावी यासाठी चारठाण्याचे समस्त गावकरी आणि इतिहास प्रेमी, शाश्‍वत पर्यटनाचे अभ्यासक, पुरातत्वीय अभ्यासक तज्ज्ञ यांच्यावतीने ‘सांस्कृतिक जागृती अभियान’चे आयोजन रविवारी (ता. 12) करण्यात आले आहे.

Image result for charthana temple

या अभियानात रविवारी सकाळी 11 वा. अभियानाचे उद्घाटन हस्ते : मा. डॉ. प्रभाकर देव (इतिहास तज्ज्ञ), प्रमुख पाहुणे : डॉ. दुलारी गुप्ते कुरेशी (माजी विभाग प्रमुख पुरातत्त्व विभाग, औरंगाबाद), डॉ. रफत कुरेशी (पुरातत्त्व अभ्यासक), मा. व्हिन्सेंट पास्किलीनी (अभ्यासक शाश्‍वत पर्यटन) यांच्या उपस्थितीत होणार आहे.

दुपारी सांस्कृतिक पदयात्रा (हेरिटेज वॉक) चार प्रमुख प्राचीन स्थळां भोवती आयोजीत करण्यात आली आहे. दुपारी 3 वाजता खुले सत्र होणार असून यात गावकरी, अभ्यासक, तज्ज्ञ यांच्यात चारठाण गावाला ‘संस्कृती ग्राम’ (हेरिटेज व्हिलेज) म्हणून मान्यता मिळविण्यासाठी करावयाच्या बाबींची चर्चा होणार आहे.

Image result for charthana temple

सांस्कृतिक जागृती अभियानाचा उद्देशच या गावाकडे अभ्यासकांचे पर्यटकांचे लक्ष वेधणे हा आहे. शासकीय पातळीवर चारठाण गावास संस्कृती ग्राम (हेरिटेज व्हिलेज) म्हणून मान्यता मिळविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.

गावात सुंदर तीन मजली लाकडी वाडे आहेत. हे जूने वाडे वास्तुशास्त्राचे उत्कृष्ठ असे नमुने आहेत. खासगी मालकीचे हे वाडे डागडुजी करून त्यांचे जतन करण्याची नितांत आवश्यकता आहे. यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. सांस्कृतिक जागृती अभियानाचे आयोजन चारठाणा ग्रामस्थ, इतिहासप्रेमी, शाश्‍वत पर्यटनासाठी झटणारे प्रवासी, पुरातत्त्व अभ्यासक यांनी स्वेच्छेने केले आहे.


Image result for charthana temple

जास्तीत जास्त लोकांनी सहभागी होण्याचे आवाहन

सांस्कृतिक जागृती अभियानासाठी इतिहास प्रेमी, अभ्यासक यांनी उपस्थित राहण्याची विनंती नानासाहेब राऊत (माजी सरपंच चारठाणा), सरपंच बी.जी. चव्हाण (चारठाणा), अजगर देशमुख (ग्रामपंचायत सदस्य, चारठाणा), इंदूमती भवाळे (पंचायत समिती सभापती, जिंतूर), लक्ष्मीकांत सोनवटकर (पुरातत्त्व अभ्यासक, चारठाणा), सचिन घाटूळ (चरठाणा)  प्रमोद पत्की (औरंगाबाद), मल्हारीकांत देशमुख (परभणी), विलासराव चारठाणकर (परभणी), युनिसेफचे राज्य सल्लागार जयंत देशपांडे (औरंगाबाद), आकाश धुमणे (पर्यटन अभ्यासक) व अभियान समन्वयक  श्रीकांत उमरीकर, अभिजीत हिरप, आकाश हिरप यांच्या वतीने करण्यात आले आहे. 

 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उस्मानाबाद की धाराशीव? या शहराचं नाव आलं कुठून?

उस्मानाबाद की धाराशीव? या शहराचं नाव आलं कुठून? प्रणाली येंगडे बीबीसी मराठीसाठी 17 जानेवारी 2021 अपडेटेड 18 जानेवारी 2021 फोटो स्रोत, GETTY IMAGES फोटो कॅप्शन, मीर उस्मान अली खान मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवरून उस्मानाबादचा "धाराशीव" असा उल्लेख झाल्यानं नामांतराचा मुद्दा परत चर्चेत आला आहे. अशावेळी या शहराच्या नावाचा इतिहास आणि त्यामागील राजकारण याविषयी घेतलेला हा संक्षिप्त आढावा. धाराशीव  नावाचा इतिहास धाराशीव या उस्मानाबादच्या पूर्वीच्या नावाविषयी अनेक कथा सांगितल्या जातात. स्कंद पुराणातील एका कथेनुसार, पूर्वी या गावात धारासूर नावाचा एक असुर (राक्षस) राहत असे. त्याच्या नावावरून गावाचे नाव धारासूर म्हणून ओळखले जायचे. धारासूरानं शंकराची आराधना करून प्रचंड शक्तीचं वरदान मिळवलं. त्यानंतर उन्मत्त होऊन त्याने लोकांना त्रास द्यायला सुरवात केली. जेव्हा सरस्वती देवीनं धारासूराचा वध केला तेव्हा तिचं नाव 'धारासुरमर्दिनी' झालं. अशाप्रकारे तिच्या नावावरूनच गावाचं नाव धाराशिव पडल्याची आख्यायिका आहे. औरंगाबादचं नाव आजवर कितीवेळा बदललंय हे तुम्हाला माहिती आहे का? औरंगाब...

अंबाजोगाईत निजाम सरकारच्या खाणाखुणा

नजरिया Home इतिहास अंबाजोगाईत निजाम सरकारच्या खाणाखुणा   Sep 16, 2018 अं बाजोगाई शहराला तसे फार मोठे ऐतिहासिक महत्त्व आहे. पूर्वी हा भाग निजाम संस्थानात असलेल्या हैदराबाद संस्थानात यायचा. त्यावेळी मराठवाडा विभागाला  ‘ मराठवाडी ’  असं  म्हटलं जायचं. हैदराबाद संस्थान काळात अंबाजोगाई शहराला जिल्हयाचा दर्जा होता.  सन १८६०-१९०० या चाळीस वर्षांच्या काळात या शहरात बऱ्याच ऐतिहासिक वास्तू निर्माण झाल्या. यापैकी अनेक देखण्या वास्तू शंभरी पार करुन आजही दिमाखात उभ्या आहेत. अनेक जुन्या वास्तूंच्या ठिकाणी त्याच कार्यालयाच्या नव्या देखण्या इमारती उभ्या आहेत.  मराठवाडा विभागातील जवळपास सर्वच गावात हे चित्र आहे. मात्र ,  अंबाजोगाई त्याकाळी जिल्हा व निजाम सरकारच्या सैन्यदलाचं मुख्य केंद्र होतं. या शहारात निजाम राजवटीतील अनेक वास्तू ,  समाध्या ,  मंदीरे ,  मस्जिद ,  ख्रिश्चन स्मशानभूमी ,  सैन्यदलाची बंकरे अशा अनेक खुणा मराठवाडा मुक्ती संग्रामापूर्वीची साक्ष देत उभ्या आहेत. या ऐतिहासिक वास्तुंचे जतन होण्याची गरज आहे. अंबाजोगाई शहरावर आणि हैदर...

केदारेश्वर मंदिर, धर्मापुरी

केदारेश्वर मंदिर, धर्मापुरी केदारेश्वर मंदिर  हे  महाराष्ट्रातील   बीड जिल्ह्यातील   धर्मापुरी गावाजवळ असलेले मध्ययुगीन  शिवमंदिर  आहे. याचे स्थापत्य  चालुक्य शैलीत  केले आहे. आरंभ  मराठवाडा  परिसर प्राचीन  शिल्प स्थापत्य  अवशेषांनी समृध्द आहे. प्राचीन ऐतिहासिक पुराव्यांचा विचार करत असताना मराठवाड्याला वगळून चालतच नाही. आजही अशा अनेक ऐतिहासिक खाणाखुणा जागोजागी सर्व मराठवाडाभर उभ्या आहेत.  सातवाहनांपासून   यादव  काळापर्यंत येथे अनेक शिल्पस्थापत्य रचना उदयास आल्या. मराठवाड्यावर सर्वप्रथम राज्य सातवाहनांनी केले. प्रतिष्ठाननगरी  ही त्यांची राजधानी होती.  वेरुळच्या कातळातून अखंड काव्य निर्माण करणारा सर्वश्रेष्ठ कलाकार कोकस हा या प्रतिष्ठानचाच. तर या प्रतिष्ठानवर इ.स.पूर्व २३५ पासून ते इ.स. २२५ असे सुमारे साडेचारशे वर्ष सातवाहनोनी राज्य केले. त्यानंतर या मराठवाड्यात इ.स. २२५ ते ५५० असे सुमारे तीनशे वर्ष  वाकाटकांनी  राज्य केले. त्यानंतर इथे बदामीच्या चालुक्यांची सत्ता निर्माण झाली. ती सुमारे दोनशे व...