मुख्य सामग्रीवर वगळा

किल्ले अंतुर

किल्ले अंतुर - १

Primary tabs


सुहास.. in भटकंती
31 Jan 2012 - 4:01 pm

गोविंदग्रजांच्या महाराष्ट्र गीतातील " कणखर देशा, राकट देशा, दगंडाच्या देशा " या ओळींची प्रचिती मला सदैव येत असते. मध्यंतरी औरंगाबादला काम निघाले होते, काम इतके अर्जेन्ट होते की मी ट्र्व्हल्स ने दीड तासाच्या पुणे-दर्शनाचा अलभ्य लाभ न घेता, डोक्यावर शिरस्त्राण धारण करुन सरळ बाईक ला किक मारली, दर दीड तासाच्या अंतरावर ब्रेक घेत-घेत औ.बाद ला पोचलो.काम संपले दुसर्‍या दिवशी, पण पुण्याकडे काही काम नव्हते. तिथुन कन्नड (हे माझे आजोळ) आणि तसच पुढे किल्ले अंतुर ला जायचे ही ठरले.

कन्नड ते नागापुरच्या रस्त्यावर एकदा सावरगांव सोडल की एक फाटा लागतो, त्या फाट्यावरुन आम्ही चौघै जण भिल्लांच्या वस्ती पाशी थबकलो. निर्जन रस्ता, शेजारी वन्य-प्राण्यांसाठी राखीव असलेले जंगल असल्यामुळे (येताना गौताळा अभयारण्यात, वरून दिसणार्‍या खोल दरीत रानडुकरांचा कळप पाहुन आलो होतो) मी उत्सुकतेपोटी विचारले. (लगे भाषा बदलत रहाती बरं का मयी , लगे औ.बाद ला पोचल्या-पोचल्या , लई ग्वाड, घ्या गुड !! )

" का रे भऊ, कही वाघ- बिघ दिसत रहात्या का इढं "

मला उत्तर आले .

" येव्ह्ढे नही रे भऊ, काल दुपारी एक बकरू मारलं तळ्यावर त्याहाने ! "

मी जिथे विचारले तिथुन तळं , पाच किमी लांब होते, आणि किल्ले अंतुर २५ किमी लांब , अर्थात त्या उत्तरात विनोदाचा भाग सोडला तर नवल नव्हतेच, नागापुरला आणि शेजारच्या ईतर गावांमध्ये ,कुटुंबातल्या प्रत्येकाने एकदा तरी वाघ पाहिला आहे, पाहिला तर मी पण आहे पण त्या वेळी एक तर तो तरी पिंजर्‍यात, किंवा मी पिंजर्‍यात किंवा कार मध्ये (याच गौताळा जंगलात आधी एक-दोनदा कार घेवुन गेलो होतो तेव्हा ही नजरेस पडला होता.)

त्याला नवल नव्हते हे मला नक्की होते, वाघ दिसो न दिसो , पण ते पुढचे २५ किमी पर्यंत बाईक मारावी की नाही या विचारात आम्ही पडलो, (येथे आम्हींची ओळख परेड देतोच आहे.) माझे ट्रेक/भटकंती चे काही नियम आहेत, पहिला म्हणजे स्वंय-सरक्षणासाठी शक्यतो नैसर्गीक संसाधने वापरायची, रॉकेल, गाडीसाठी पेट्रोल आणि पटदिशी मशाल पेटविता येईल अशी सर्व साधने बॅग मध्ये होतीच. येताना ३० किमी च्या घनदात जंगला ची वारी झालीच होती. मौसम पानझडी चा असला तरी, सागवान , चंदनाचा घमघमाट होता, जाताना काही चिंचा पाडल्या आणि खिशात आणि डिक्की त ही घातल्या.



त्या दिवशी आमचे नशीब जोरावर होते, कॅमेराचे सेल घ्यावेत म्हणुन नागापुरात शिरलो आणि नागापुर ला बाजार होता, बाजारात खादाडी केली.

na

.

तिथुन दुर्दम्य अश्या रस्त्यावर बाईक मारत-मारत गेलो !! अर्थात त्याची पण एक गंमत च आहे, रस्त्यावर , दुर-दुरपर्यंत चिटपाखरु नव्हते. जाताना एक खांब दिसला, त्यावर कोणती भाषा आहे ते कळेना च. ऊर्दु-सदृश्य आहे.
(जाणकार मिपा-कर सांगतील अशी आशा आहे.)
.

.

.

.

.

आणि सरतेशेवटी किल्ला दिसला आणि त्या ही पुढे असे म्हणेन की अजुन खडतर प्रवासाला सुरुवात झाली. एका बाजुला खोल दरी, जंगल आणि नुसती पानांची सळ-सळ झाली तरी भिती वाटावी इतकी भयाण शांतता !!

.

.

.

.

.

क्रमश ::::::Ì

अंतूर अजिंठा-सातमाळा रांगेतील जवळजवळ शेवटचा किल्ला. त्याच्याजवळच सुतोंडी म्हणून पण एक किल्ला आहे. बाकी तो स्तंभ उर्दूतील नसून फारसी भाषेतील वाटतोय.
अंतूर फार प्राचीन असावा हे नक्की. किंबहुना त्या रांगेतील सगळेच किल्ले प्राचीन आहेत.

..............................................................................


माझा मराठवाडा : किल्ले अंतुर - २

Primary tabs

सुहास..'s picture
सुहास.. in भटकंती
2 Feb 2012 - 1:38 pm

http://www.misalpav.com/node/20570

किल्ल्याचा दुसर्‍या अंधारलेल्या दरवाजातुन आत शिरलो. वटवाघळांच्या चित्काराने आणि त्या आवाजाचा घुमटाकार दरवाजाच्यामुळे झालेल्या ईको मुळे परिसर दणाणुन गेला, साहजिकच हातात काठ्या घेण्यात आल्या. रॉकेल ची क्वार्टर-साईज बाटली बेल्टच्या लुप मध्ये अडकवली आणि पुढचा प्रवास सुरू केला, त्या आधी घोडे-बांधणी ची जागा, तत्सम आत येणार्‍या पाहुण्यांची नोंद वा चेकिंग करणारे, खालपर्यंत नजर ठेवणारे दरवाजे आणि काही ठिकाणी कडेबंद करणारी वाट दिसत होती, त्यावरून अंदाज येत होता की हा किल्ला नुसता रहाण्याची सोय नसुन दसरे ही काही आहे..पण का ??? ते मात्र मला शेवटपर्यंत कळाले नाही. अर्थात वर असलेले एक बंदीगृह पाहुन ही मला आश्चर्य वाटले. ( हे माझे काही अंदाज आहेत, नीटसं किंवा त्याला दुजोरा देणारे माझ्याकडे काहीच नाही. )

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

वटवाघळांच्या चित्काराने दुम-दुमणारे हेच ते गेट (दरवाजा क्रंमाक दोन !! हा दरवाजा मी आलेल्या वाटेतुन...सॉरी पांदीतुन...म्हणजे एका बाजुला दरी आणि वर बूरूज अश्या वाटेतुन ९० अंशातुन !! ) आणि बाहेर येताना.

.

.

.

.

पुन्हा नव्वद अंशात वळालो, आणि समोर वर पुन्हा पाटी दिसली. आणि पुन्हा नेमकी कुठली भाषा कळेना.

.

पाटी शिवाय ३०-३५ एकर पसरलेल्या किल्ल्यावर असलेल्या काही दगडांवरच्या खाणा-खुणा, काही अचानक दिसणारी गुहा कम वाट , कुठे थेट जमीनीत घुसणार खंदक, एक छान स तळ ,काही घुमटाकार खोल्या !!

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

क्रमश .....

( फोटोच जास्त आहेत म्हणुन टप्प्या-टप्याने लिहीत आहे. )


"आहे मनोहर तरी गमते उदास" म्हणण्यासारखं सगळं वातावरण दिसतंय. ते नक्षीकाम वगैरे शिवकालाच्या पूर्वीचं असणार नक्कीच. या किल्ल्यावर कोणी चिटपाखरूही फिरकत नसावं बहुधा. कोणीतरी शोधाशोध करून या किल्ल्याची जास्त माहिती काढा रे!

http://fortsinmaharashtras.blogspot.in/2009/08/antur-fort.html

इथल्या माहितीप्रमाणे तो किल्ला १५ या शतकात बांधला. मग निझामशहाच्या ताब्यात असताना मलिक अंबरने काही बांधकामे केली. पण या किल्ल्याबद्दल जास्त माहिती कुठे मिळत नाहीये.

माझा मराठवाडा : किल्ले अंतुर - २

Primary tabs

सुहास..'s picture
सुहास.. in भटकंती
2 Feb 2012 - 1:38 pm

http://www.misalpav.com/node/20570

किल्ल्याचा दुसर्‍या अंधारलेल्या दरवाजातुन आत शिरलो. वटवाघळांच्या चित्काराने आणि त्या आवाजाचा घुमटाकार दरवाजाच्यामुळे झालेल्या ईको मुळे परिसर दणाणुन गेला, साहजिकच हातात काठ्या घेण्यात आल्या. रॉकेल ची क्वार्टर-साईज बाटली बेल्टच्या लुप मध्ये अडकवली आणि पुढचा प्रवास सुरू केला, त्या आधी घोडे-बांधणी ची जागा, तत्सम आत येणार्‍या पाहुण्यांची नोंद वा चेकिंग करणारे, खालपर्यंत नजर ठेवणारे दरवाजे आणि काही ठिकाणी कडेबंद करणारी वाट दिसत होती, त्यावरून अंदाज येत होता की हा किल्ला नुसता रहाण्याची सोय नसुन दसरे ही काही आहे..पण का ??? ते मात्र मला शेवटपर्यंत कळाले नाही. अर्थात वर असलेले एक बंदीगृह पाहुन ही मला आश्चर्य वाटले. ( हे माझे काही अंदाज आहेत, नीटसं किंवा त्याला दुजोरा देणारे माझ्याकडे काहीच नाही. )

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

वटवाघळांच्या चित्काराने दुम-दुमणारे हेच ते गेट (दरवाजा क्रंमाक दोन !! हा दरवाजा मी आलेल्या वाटेतुन...सॉरी पांदीतुन...म्हणजे एका बाजुला दरी आणि वर बूरूज अश्या वाटेतुन ९० अंशातुन !! ) आणि बाहेर येताना.

.

.

.

.

पुन्हा नव्वद अंशात वळालो, आणि समोर वर पुन्हा पाटी दिसली. आणि पुन्हा नेमकी कुठली भाषा कळेना.

.

पाटी शिवाय ३०-३५ एकर पसरलेल्या किल्ल्यावर असलेल्या काही दगडांवरच्या खाणा-खुणा, काही अचानक दिसणारी गुहा कम वाट , कुठे थेट जमीनीत घुसणार खंदक, एक छान स तळ ,काही घुमटाकार खोल्या !!

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

क्रमश .....

( फोटोच जास्त आहेत म्हणुन टप्प्या-टप्याने लिहीत आहे. )

प्रतिक्रिया

जबराट.. एकदम गूढ किल्ला आहे

+१ अगदी..

कायकाय कथा असेल प्रत्येक दगडाने पाहिलेली कोण जाणे...

टक्कू's picture

9 Sep 2013 - 11:31 pm | टक्कू

रियली!
सहीच.

मस्त फोटो रे.
चाकोरीबाहेरच्या किल्ल्याची ओळख आवडली.

पैसा's picture

2 Feb 2012 - 1:46 pm | पैसा

"आहे मनोहर तरी गमते उदास" म्हणण्यासारखं सगळं वातावरण दिसतंय. ते नक्षीकाम वगैरे शिवकालाच्या पूर्वीचं असणार नक्कीच. या किल्ल्यावर कोणी चिटपाखरूही फिरकत नसावं बहुधा. कोणीतरी शोधाशोध करून या किल्ल्याची जास्त माहिती काढा रे!

http://fortsinmaharashtras.blogspot.in/2009/08/antur-fort.html

इथल्या माहितीप्रमाणे तो किल्ला १५ या शतकात बांधला. मग निझामशहाच्या ताब्यात असताना मलिक अंबरने काही बांधकामे केली. पण या किल्ल्याबद्दल जास्त माहिती कुठे मिळत नाहीये.

बिपिन कार्यकर्ते's picture

2 Feb 2012 - 4:42 pm | बिपिन कार्यकर्ते

"आहे मनोहर तरी गमते उदास" म्हणण्यासारखं सगळं वातावरण दिसतंय. ते नक्षीकाम वगैरे शिवकालाच्या पूर्वीचं असणार नक्कीच. या किल्ल्यावर कोणी चिटपाखरूही फिरकत नसावं बहुधा. कोणीतरी शोधाशोध करून या किल्ल्याची जास्त माहिती काढा रे!

+१

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Feb 2012 - 7:22 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>>>पण या किल्ल्याबद्दल जास्त माहिती कुठे मिळत नाहीये.

आमच्या एका इतिहासप्रेमी मित्राचं म्हणनं आहे की, हा किल्ला नव्हेच. गढ्या अशाच असायच्या तेव्हा किल्ला म्हणू नये, किल्ल्याची वैशिष्ट्ये तपासून याला किल्ला घोषित केले पाहिजे. माझ्या
महाविद्यालयाच्या ग्रंथालयात मराठवाड्याच्या इतिहासाबद्दल जुजबी माहिती असलेलं पुस्तक आहे, कालपासून या किल्ल्याचा कुठे उल्लेख येतोय का ते पाहतोय पण त्यात काही यश अजुन मिळेना. मराठवाड्याचे शिलालेख नावाचे पुस्तक आहे त्यात काही शिलालेख सापडतात का त्यावरही वाचन सुरु आहेच. काही हाती लागलं तर सविस्तर प्रतिक्रिया या गढी-किल्ल्याच्या निमित्ताने लेखमालेत डकवेन म्हणतो... तो पर्यंत वाचत राहु या.......!

आम्ही मराठवाड्यातील काही मिपाकर मंडळी 'आमचा मराठवाडा' असा विषय घेऊन मिपावर लिहिणार आहोत. (कधी ते माहित नाही. वर्ष सहा महिन्यापूर्वी प्राथमिक चर्चा झाल्या आहेत. करिता माहितीस्तव. ) :)

-दिलीप बिरुटे


वप्या !! हे अजुन दोन अ‍ॅन्गल्स

पेर्‍या !!

माकंडाची, माकडांशी झालेली मस्ती शेवटच्या भागात लिहितो आहेच ;)

आधीच्या धाग्यात जे pillar वर लिहीले आहे ते अन या धाग्यात , समोर वर जी पाटी दिसली तिथेही जी भाषा आहे ती फारसी / पर्शियन च आहे. (अब्बूजान असते तर त्यांनी तुला अर्थ समजावून सांगीतला असता कारण त्यांनी एम ए पर्शियन भाषेत केले होते ) पण... असो ,

A square stone pillar two miles south of Antur contains an inscription mentioning the direction of Nagapur and Jalna on the east, Mehawar and Chalisgaon on the west, Antur and Burhanpur on the north, and Daulatabad and Ahmadnagar on the south. It records the Hijri date 1000 (A.D. 1583), and states that it was erected during the reign of Murtaza Nizam Shah. A small masjid within the fort has a Persian inscription which mentions that it was built by Ismail Husain in Hijri 1025 (A.D. 1608). Another Persian and Arabic inscription on one of the fort bastions is as follows:- " This lower wall was constructed during the reign and under the auspices of Burhan Nizam Shah, the fountain head of wisdom, by Malik Ambar, the wisest of the wise and benefactor of the world, in the year 1007 Hijri" (A.D. 1590). A later inscription upon a small arch within the second gateway is dated 1035 Hijri (A.D. 1618), and mentions that the arch was built by order of Malik Ambar


मस्त किल्ला आहे आणि वर्णन सुद्धा !
बराच काळ निजामशाहीत आणि नंतर मोगल,निजाम यांच्याकडे राहिलेला किल्ला.....त्यामुळे मराठ्यांच्या फारश्या खाणाखुणा दिसत नसाव्यात !

अंतुर हा यादवकालीन किल्ला.कदाचित १२/१३ व्या शतकातला. पितळखोरा लेणी, शृंगारचौरीची लेणी याला तशी जवळ त्यामुळे तो यादवांच्याही आधीचा असावा पण त्याला पुरातत्वीय पुरावा नाही. १५५४ च्या सुमारास दनय्या रूईरायाकडे ह्या किल्ल्याचा ताबा होता. त्यावेळी अहमदनगरच्या निजामाने स्वारी करून तोफांच्या मार्‍याने तटाला भगदाड पाडले व किल्ला घेतला. पुढे निजामाकडून मोंगलाकडे व परत १७ व्या शतकात तो निजामाकडे आला. शेवटी हाही किल्ला नंतर इंग्रजांच्या ताब्यात जाउन वैराण झाला.

खालून पाचव्या फोटोत जे कमलदलचिन्ह आहे ते यादवांचे.


Dakhan History : Musalman And Maratha, A.D. 1300 To 1818
Author : Loch W.W. Loch Esquire

त्यात या किल्याचा उल्लेख नक्कीच आहे

काल महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची सहल घेऊन गेलो होतो. किल्ल्यापर्यंत पोहचता पोहचता थकुन गेलो. गौताळ्याचा घाट ओलांडून ( ही आमची पहिली चूक) नागद मार्गे जाणे मला वाटतं जाण्यात चूक झाली. विद्यार्थी भर दुपारी चारेक किलोमिटर डोंगर चढणे तसं कठीण होतं. नागदवरुन परत गौताळ्याचा घाट चढून नागापूर फाट्याच्या रस्त्याला लागलो. दुसरी चूक होती व्हाल्वो टाईपच्या बसेस घेऊन जाऊ नये. (होत काही नाही, काही वळणावर देवाचा धावा करायची वेळ येते) आणि मग नागापूरहुन सहाएक किलोमिटरचा वळणावळणाच्या रस्त्याने बस पुढे जाऊ शकत नाही, अशा थांब्याला बस उभी करुन आंतुर किल्ल्याचा मार्ग धरला. आंतुर किल्ला तसा केवळ अवशेषापुरता उरला आहे. दाट झाडी. जागोजागी वाहते पाण्याचे झरे, जंगली पानं फुलं. रस्त्यात मोठमोठे पडलेले दगड बाकी, सुहासने वर्णन केलेच आहे. इति.

काल सुहासची आठ्वण झाली होती.


सबब लिखाण पश्चिम महाराष्ट्रातल्या, खासकरून पुण्यातल्या, मंडळींनी हलक्याने घ्यावे अशी विनंती करून -

१९९४ ची गोष्ट. मित्रांसोबत सिंहगडला जाणे सुखद वाटत होते. कारण आतापर्यंत न केलेला 'गड चढणे' नावाचा आंनंददायक प्रकार इथे अनुभवाला येत होता. गप्पा, टप्पा, मौज, मस्ती मधे ३-४ तास गेले. शेवटी मी विचारले, "किल्ला कुठे आहे? आपण टाइमपासच जास्त करत आहोत." मी किती खोल मूर्ख आहे याची कल्पना असल्याने, जी साधारणतः मराठवाडाकरांबद्दल पुणेकरांची मनातल्या मनात असते, माझ्या पुणेकर मित्रांनी तो प्रश्न मनावर घेतला नाही. पण जगातल्या प्रत्येक आत्मश्रेष्ठत्ववादी समूहामधे (इतरांच्या) सुदैवाने एक ना एक अरुंधती रॉय असतेच. आमच्यातही एक होती. तिने सांगीतले, "जोश्या, आपण मघाच्या १-२ तासांपासून किल्ल्याच्या आत आहोत. किल्ला म्हणजे तुला नक्की काय अपेक्षित होतं?".
"दोन दरवाजे आणि थोडंसं भितांड किल्ला म्हणवून घ्यायला पुरेसं नाही. औस्याचा किल्ला, उदगीरचा किल्ला, नळदुर्गचा किल्ला, परांड्याचा किल्ला, औरंगाबादचा किल्ला असे गडश्रेष्ठ पाहिलेल्या मला आपण केवळ एका डोंगरावर आलो आहोत असे वाटतंय. आमच्याकडच्या किल्ल्यांत एकटे जाल आणि जास्त लूडबूड कराल तर हरवून जायची फार शक्यता आहे. इथे तर हरवून जायला ओपनली ऑफर केलं तरी ते शक्य नाही."
मग मराठवाडा विरुद्ध पश्चिम महाराष्ट्र असे तुळुंब युद्ध झाले, त्यात मराठवाड्याचे दणकट किल्ले पुण्याच्या गनिमी काव्यात सहजी बळी पडले हे सु़ज्ञास वेगळे सांगणे न लगे.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उस्मानाबाद की धाराशीव? या शहराचं नाव आलं कुठून?

उस्मानाबाद की धाराशीव? या शहराचं नाव आलं कुठून? प्रणाली येंगडे बीबीसी मराठीसाठी 17 जानेवारी 2021 अपडेटेड 18 जानेवारी 2021 फोटो स्रोत, GETTY IMAGES फोटो कॅप्शन, मीर उस्मान अली खान मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवरून उस्मानाबादचा "धाराशीव" असा उल्लेख झाल्यानं नामांतराचा मुद्दा परत चर्चेत आला आहे. अशावेळी या शहराच्या नावाचा इतिहास आणि त्यामागील राजकारण याविषयी घेतलेला हा संक्षिप्त आढावा. धाराशीव  नावाचा इतिहास धाराशीव या उस्मानाबादच्या पूर्वीच्या नावाविषयी अनेक कथा सांगितल्या जातात. स्कंद पुराणातील एका कथेनुसार, पूर्वी या गावात धारासूर नावाचा एक असुर (राक्षस) राहत असे. त्याच्या नावावरून गावाचे नाव धारासूर म्हणून ओळखले जायचे. धारासूरानं शंकराची आराधना करून प्रचंड शक्तीचं वरदान मिळवलं. त्यानंतर उन्मत्त होऊन त्याने लोकांना त्रास द्यायला सुरवात केली. जेव्हा सरस्वती देवीनं धारासूराचा वध केला तेव्हा तिचं नाव 'धारासुरमर्दिनी' झालं. अशाप्रकारे तिच्या नावावरूनच गावाचं नाव धाराशिव पडल्याची आख्यायिका आहे. औरंगाबादचं नाव आजवर कितीवेळा बदललंय हे तुम्हाला माहिती आहे का? औरंगाब...

अंबाजोगाईत निजाम सरकारच्या खाणाखुणा

नजरिया Home इतिहास अंबाजोगाईत निजाम सरकारच्या खाणाखुणा   Sep 16, 2018 अं बाजोगाई शहराला तसे फार मोठे ऐतिहासिक महत्त्व आहे. पूर्वी हा भाग निजाम संस्थानात असलेल्या हैदराबाद संस्थानात यायचा. त्यावेळी मराठवाडा विभागाला  ‘ मराठवाडी ’  असं  म्हटलं जायचं. हैदराबाद संस्थान काळात अंबाजोगाई शहराला जिल्हयाचा दर्जा होता.  सन १८६०-१९०० या चाळीस वर्षांच्या काळात या शहरात बऱ्याच ऐतिहासिक वास्तू निर्माण झाल्या. यापैकी अनेक देखण्या वास्तू शंभरी पार करुन आजही दिमाखात उभ्या आहेत. अनेक जुन्या वास्तूंच्या ठिकाणी त्याच कार्यालयाच्या नव्या देखण्या इमारती उभ्या आहेत.  मराठवाडा विभागातील जवळपास सर्वच गावात हे चित्र आहे. मात्र ,  अंबाजोगाई त्याकाळी जिल्हा व निजाम सरकारच्या सैन्यदलाचं मुख्य केंद्र होतं. या शहारात निजाम राजवटीतील अनेक वास्तू ,  समाध्या ,  मंदीरे ,  मस्जिद ,  ख्रिश्चन स्मशानभूमी ,  सैन्यदलाची बंकरे अशा अनेक खुणा मराठवाडा मुक्ती संग्रामापूर्वीची साक्ष देत उभ्या आहेत. या ऐतिहासिक वास्तुंचे जतन होण्याची गरज आहे. अंबाजोगाई शहरावर आणि हैदर...

केदारेश्वर मंदिर, धर्मापुरी

केदारेश्वर मंदिर, धर्मापुरी केदारेश्वर मंदिर  हे  महाराष्ट्रातील   बीड जिल्ह्यातील   धर्मापुरी गावाजवळ असलेले मध्ययुगीन  शिवमंदिर  आहे. याचे स्थापत्य  चालुक्य शैलीत  केले आहे. आरंभ  मराठवाडा  परिसर प्राचीन  शिल्प स्थापत्य  अवशेषांनी समृध्द आहे. प्राचीन ऐतिहासिक पुराव्यांचा विचार करत असताना मराठवाड्याला वगळून चालतच नाही. आजही अशा अनेक ऐतिहासिक खाणाखुणा जागोजागी सर्व मराठवाडाभर उभ्या आहेत.  सातवाहनांपासून   यादव  काळापर्यंत येथे अनेक शिल्पस्थापत्य रचना उदयास आल्या. मराठवाड्यावर सर्वप्रथम राज्य सातवाहनांनी केले. प्रतिष्ठाननगरी  ही त्यांची राजधानी होती.  वेरुळच्या कातळातून अखंड काव्य निर्माण करणारा सर्वश्रेष्ठ कलाकार कोकस हा या प्रतिष्ठानचाच. तर या प्रतिष्ठानवर इ.स.पूर्व २३५ पासून ते इ.स. २२५ असे सुमारे साडेचारशे वर्ष सातवाहनोनी राज्य केले. त्यानंतर या मराठवाड्यात इ.स. २२५ ते ५५० असे सुमारे तीनशे वर्ष  वाकाटकांनी  राज्य केले. त्यानंतर इथे बदामीच्या चालुक्यांची सत्ता निर्माण झाली. ती सुमारे दोनशे व...