मुख्य सामग्रीवर वगळा

मराठवाड्यातील दुर्लक्षित किल्ले



मराठवाडा.. बहामनी (मुघलशाहीबेदरशाहीआदिलशाही,निजामशाहीसत्तेच्या वरवंट्याखाली रगडलेला मराठवाडायवनी पाशवी अत्याचाराचा मूक साक्षीदार म्हणजे मराठवाडासत्तांतराची साक्ष देणारा मराठवाडा.. तसेच नामांतराची चळवळ छातीवर झेलणारा मराठवाडाया मराठवाड्यात आठ जिल्ह्यांचा समावेश होतो,उस्मानाबाद-बीड-लातूर-परभणी-नांदेड-हिंगोली-जालना-औरंगाबाद.साधारणतः उजाड माळरान भूभाग म्हणजेच पठारी प्रदेशनिसर्गाने आखडून घेतलेला हात आणि राजकारण्यांनी दिलेलं आश्वासनांचे डोईजड गाठोडेसाठ वर्षांच्या स्वतंत्र भारतातील एक दुर्लक्षित भूप्रदेश म्हणजे मराठवाडामराठवाड्याने महाराष्ट्राला तब्बल तिन मुख्यमंत्री दिले.. विरोधी पक्षातील आघाडीचे नेतेदेखिल याच भागातले.. पण मराठवाडा मात्र आहे तसाच राहिला.. उपेक्षितपण मित्रहो मराठवाडा हि संतांची भूमी देखिल आहे..! मराठवाड्याचा इतिहास तसा मोठा आहे.. पार यादवकालापासूनतसेच त्रेतायुगातील घटनांचे संदर्भ सांगणारी काही ऐतिहासिक स्थळे इकडे आहेत अजंठा-वेरूळ लेणी,देवगिरी साम्राज्याचा साक्षीदारतुघलकाच्या विक्षिप्तपणाचा पुरावा,बौद्धकालिन शिल्पकला असणारी खारोसा लेणीघटोत्कच लेणी,पितळखोरे लेणी.. रामायणातील दंडकारण्यातील काही भाग मराठवाड्यात येतो.. हिंदवी स्वराज्याची कुलदेवता आई तुळजाभवानीचे मंदिर हे मराठवाडा भागात येते हे नव्याने सांगायला नको.. तर मंडळी असा हा आपला सर्वांचा लाडका असा इतिहाससंपन्न मराठवाडा.

सह्याद्री हे नाव घेतलं की सामोरी येतात पावलांना कापरे देणाऱ्या कातळधाराउंचपुरे सरळसोट तुटलेले बेलाग दुर्गम कडेघनदाट जंगलांनी गर्द विळखा घातलेल्या दऱ्या आणि हिरवाईची चादर ओढून विविध जीवसृष्टी अंगाखांद्यावर खेळवणारी हिरवीकंच वनराईवर्ल्ड हेरीटेज चा दर्जा मिळालेला असा पश्चिम घाटातील आपला सखा-सोयरा सह्याद्री.. एखाद्या लहान मुलाला जरी स्वराज्यातील किल्ल्यांची नावं विचारलीतर प्रतापगडराजगडतोरणासिंहगड हि नावे त्यांच्या मुखोद्गत असतातपण मराठवाड्यातील काही किल्ल्यांची नावे कुणाला विचारलं तर एकाच्या चेहऱ्यावरची माशी हलणार नाही असे प्रश्नचिन्ह(?). त्यामुळेच मराठवाड्यातील किल्ले कसे असतीलत्यावर नेमकं काय पाहायला मिळेल ! अशी उत्सुकता कायम मनात दाटून असायची.मराठवाडा हा प्रभाग जसा राजकीय दृष्ट्या दुर्लक्षित तसाच तो हाडाच्या भटक्यामंडळीना भुरळ पाडत नाहीम्हणूनच या मराठवाड्यातील किल्ल्याचं रहस्य नेमकं काय आहे ते पाहण्याचा वज्र निर्धार केला.सहा-आठ महिन्यांपूर्वी हाडाचा भटक्या उपेंद्रने मराठवाडा भटकंतीचा बेत आखला पण पुढे काही कारणाने तो बारगळला.  मग अशाच एका उनाड संध्याकाळी चंद्रकांतचा तावातावाने फोन आला, दहा दिवसांची सुट्टी टाकतोय.. बघ काही मेगा प्लान भटकंतीचाक्षणाचाही वेळ न दवडता तातडीने मराठवाडा दुर्गभ्रमंती चा बेत नक्की केला.. सोबत विदर्भातील काही किल्ल्यांना भेट द्यायचे ठरले.. मोहीम सुरु झाली सोलापुरातील काही ठराविक किल्ल्यांपासून (अकलूजटेंभूर्णीमाढा किल्ले पाहूनमोहिमेचा श्रीगणेशा करण्याचे ठरलेयंदाच्या मोहिमेलाF1 चालक-मालक संघटनेचे नवनिर्वाचित अध्यक्ष माश्री दिनेशभाऊ रावळ यांनी लाजवंती डिझलगाडी घेवून येण्याचे मान्य केले आणि लांबलचक मोहिमेच्या खर्चाची दांडगी बचत केलीया मोहिमेचे सारथ्य भाऊंनी अथ पासून इति पर्यंत करण्याचे शेल्फ डिक्लेअर करून टाकले आणि वारज्यातील सोबा पूरम वसाहतीतील तिरप्या रॉकेट कमानीखाली नारळतोड कार्यक्रमाने मोहिमेला सुरुवात झाली.  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उस्मानाबाद की धाराशीव? या शहराचं नाव आलं कुठून?

उस्मानाबाद की धाराशीव? या शहराचं नाव आलं कुठून? प्रणाली येंगडे बीबीसी मराठीसाठी 17 जानेवारी 2021 अपडेटेड 18 जानेवारी 2021 फोटो स्रोत, GETTY IMAGES फोटो कॅप्शन, मीर उस्मान अली खान मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवरून उस्मानाबादचा "धाराशीव" असा उल्लेख झाल्यानं नामांतराचा मुद्दा परत चर्चेत आला आहे. अशावेळी या शहराच्या नावाचा इतिहास आणि त्यामागील राजकारण याविषयी घेतलेला हा संक्षिप्त आढावा. धाराशीव  नावाचा इतिहास धाराशीव या उस्मानाबादच्या पूर्वीच्या नावाविषयी अनेक कथा सांगितल्या जातात. स्कंद पुराणातील एका कथेनुसार, पूर्वी या गावात धारासूर नावाचा एक असुर (राक्षस) राहत असे. त्याच्या नावावरून गावाचे नाव धारासूर म्हणून ओळखले जायचे. धारासूरानं शंकराची आराधना करून प्रचंड शक्तीचं वरदान मिळवलं. त्यानंतर उन्मत्त होऊन त्याने लोकांना त्रास द्यायला सुरवात केली. जेव्हा सरस्वती देवीनं धारासूराचा वध केला तेव्हा तिचं नाव 'धारासुरमर्दिनी' झालं. अशाप्रकारे तिच्या नावावरूनच गावाचं नाव धाराशिव पडल्याची आख्यायिका आहे. औरंगाबादचं नाव आजवर कितीवेळा बदललंय हे तुम्हाला माहिती आहे का? औरंगाब...

अंबाजोगाईत निजाम सरकारच्या खाणाखुणा

नजरिया Home इतिहास अंबाजोगाईत निजाम सरकारच्या खाणाखुणा   Sep 16, 2018 अं बाजोगाई शहराला तसे फार मोठे ऐतिहासिक महत्त्व आहे. पूर्वी हा भाग निजाम संस्थानात असलेल्या हैदराबाद संस्थानात यायचा. त्यावेळी मराठवाडा विभागाला  ‘ मराठवाडी ’  असं  म्हटलं जायचं. हैदराबाद संस्थान काळात अंबाजोगाई शहराला जिल्हयाचा दर्जा होता.  सन १८६०-१९०० या चाळीस वर्षांच्या काळात या शहरात बऱ्याच ऐतिहासिक वास्तू निर्माण झाल्या. यापैकी अनेक देखण्या वास्तू शंभरी पार करुन आजही दिमाखात उभ्या आहेत. अनेक जुन्या वास्तूंच्या ठिकाणी त्याच कार्यालयाच्या नव्या देखण्या इमारती उभ्या आहेत.  मराठवाडा विभागातील जवळपास सर्वच गावात हे चित्र आहे. मात्र ,  अंबाजोगाई त्याकाळी जिल्हा व निजाम सरकारच्या सैन्यदलाचं मुख्य केंद्र होतं. या शहारात निजाम राजवटीतील अनेक वास्तू ,  समाध्या ,  मंदीरे ,  मस्जिद ,  ख्रिश्चन स्मशानभूमी ,  सैन्यदलाची बंकरे अशा अनेक खुणा मराठवाडा मुक्ती संग्रामापूर्वीची साक्ष देत उभ्या आहेत. या ऐतिहासिक वास्तुंचे जतन होण्याची गरज आहे. अंबाजोगाई शहरावर आणि हैदर...

केदारेश्वर मंदिर, धर्मापुरी

केदारेश्वर मंदिर, धर्मापुरी केदारेश्वर मंदिर  हे  महाराष्ट्रातील   बीड जिल्ह्यातील   धर्मापुरी गावाजवळ असलेले मध्ययुगीन  शिवमंदिर  आहे. याचे स्थापत्य  चालुक्य शैलीत  केले आहे. आरंभ  मराठवाडा  परिसर प्राचीन  शिल्प स्थापत्य  अवशेषांनी समृध्द आहे. प्राचीन ऐतिहासिक पुराव्यांचा विचार करत असताना मराठवाड्याला वगळून चालतच नाही. आजही अशा अनेक ऐतिहासिक खाणाखुणा जागोजागी सर्व मराठवाडाभर उभ्या आहेत.  सातवाहनांपासून   यादव  काळापर्यंत येथे अनेक शिल्पस्थापत्य रचना उदयास आल्या. मराठवाड्यावर सर्वप्रथम राज्य सातवाहनांनी केले. प्रतिष्ठाननगरी  ही त्यांची राजधानी होती.  वेरुळच्या कातळातून अखंड काव्य निर्माण करणारा सर्वश्रेष्ठ कलाकार कोकस हा या प्रतिष्ठानचाच. तर या प्रतिष्ठानवर इ.स.पूर्व २३५ पासून ते इ.स. २२५ असे सुमारे साडेचारशे वर्ष सातवाहनोनी राज्य केले. त्यानंतर या मराठवाड्यात इ.स. २२५ ते ५५० असे सुमारे तीनशे वर्ष  वाकाटकांनी  राज्य केले. त्यानंतर इथे बदामीच्या चालुक्यांची सत्ता निर्माण झाली. ती सुमारे दोनशे व...