मराठवाड्यातील सात किल्ल्यांचे लवकरच पालटणार रूप
5 वर्षांपूर्वी

औरंगाबाद - गडकिल्ल्यांच्या देशा, महाराष्ट्र देशा, असे म्हटले जात असले तरी मराठवाड्यातील किल्ल्यांच्या नशिबी कायमच सापत्न वागणूक आली आहे. मात्र, शासनाने स्थापन केलेल्या गड संवर्धन समितीच्या प्रयत्नांमुळे मराठवाड्यातील किल्ल्यांचे रूप पालटणार असून सहा किल्ल्यांच्या संवर्धनाचे काम सुरू झाले आहे. यावर्षी यात आणखी एका किल्ल्याची भर पडली आहे. गेल्या दोन वर्षांत संवर्धनाच्या कार्यक्रमात समाविष्ट केलेल्या राज्यातील ३० किल्ल्यांपैकी मराठवाड्यातील आहेत, हे विशेष.
सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी गडकिल्ल्यांचे संरक्षण आणि संवर्धनासाठी तज्ज्ञांची समिती गठित केली. तावडे समितीचे अध्यक्ष असून ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ पांडुरंग बलकवडे प्रमुख मार्गदर्शक आहेत. महिन्यातून एकदा सर्व सदस्यांची बैठक होते. बैठकीतील निर्णयांवर तीन महिन्यांनी शिक्कामोर्तब केले जाते. दोन वर्षांत समितीने राज्यातील किल्ल्यांचे संवर्धन करण्याची योजना आखली आहे. यात मराठवाड्याला झुकते माप मिळाले आहे.
३०पैकी किल्ले मराठवाड्यातील : दुर्गसंवर्धन समितीने गेल्या दोन वर्षांत ३० किल्ल्यांच्या संवर्धनाचा कार्यक्रम आखला आहे. गेल्या वर्षी १३ सप्टेंबर २०१५ रोजी तावडे यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत एकूण १६ किल्ल्यांचे संवर्धन करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले . या बैठकीत संकेत कुलकर्णी यांनी मराठवाड्यातील किल्ल्यांची दुर्दशा मांडली. तावडे यांनी त्याची दखल घेऊन कंधार, माहूर, धारूर, अंतुर, परांडा आणि औसा किल्ल्यांच्या संवर्धनाला मंजुरी दिली. याचे अंदाजपत्रक पूर्ण होऊन प्रत्यक्ष काम हाती घेण्यात आले आहे. प्रत्येक किल्ल्याला सुमारे ते साडेचार कोटी रुपये असे एकूण २२ कोटी रुपये मंजूर झाले आहेत.
रायगडाला जागतिक वारसा करणार : रायगडालाजागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यासाठीही सरकारचे प्रयत्न आहेत. पन्हाळगड-राजगड-रायगड या तीन गडांना एकत्रितपणे जागतिक वारसा स्थळाच्या यादीत समाविष्ट करण्यासाठी सरकारने चाचपणी सुरू केली आहे.
मराठवाड्यात १५ किल्ले
राज्यात ५५० गड किल्ले आहेत. पैकी ३६० किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित आहेत. मराठवाड्यात १५ किल्ले आहेत. यात दौलताबादचा देवगिरी, भांगसीमाता गड, अंतुर, कंधार, नळदुर्ग, परांडा, धारूर, औसा, वेताळवाडी, जंजाळा, सुतांेडा, उदगीर, पाथ्री (परभणी), परळी आणि माहूरच्या किल्ल्यांचा समावेश आहे. दुर्ग संवर्धन समितीत १५ जणांमध्ये तरूण अभ्यासक संकेत कुलकर्णी यांचा समावेश आहे. त्यांच्या प्रयत्नांना बऱ्यापैकी यश आले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा