मुख्य सामग्रीवर वगळा

माळशिरस येथील सखुबाई महादजी निंबाळकर यांची दुर्लक्षित भग्न समाधी

माळशिरस येथील सखुबाई महादजी निंबाळकर यांची दुर्लक्षित भग्न समाधी

 अकलूजचे अविनाश जाधव यांनी ओर्कुटवरती  लिहिलेल्लीहिलेला लेख
२४ सप्टेंबरला मी सत्यशोधक समाज्याच्या १३७ व्या वर्धापन दिनासाठी " महात्मा फुलेवाडा , पुणे " येथे सत्यशोधक समाज्याच्या कार्यक्रमाला गेलो होतो...
तेथे बाबा आढाव यांनी " पुरोगामी सत्यशोधक " हे त्रेमासीख प्रकाशित केले त्यात अकलूज येथील सखुबाई ( सकवार ) महादजी निंबाळकर यांची भग्न समाधी बाबत प्रबोधन पर लेख होता या अंकाचे मुखपृष्ठच या समाधीच्या फोटोने आहे..



बाबांनी ( बाबा आढाव ) सखुबाई महादजी निंबाळकर यांचा इतिहास सांगितला .... हा इतिहास आणि ती भग्न समाधी पाहून मन सुन्न झाले..

प्रथमच मराठा असल्याची लाज वाटली...

त्या नंतर अंकाच्या चार प्रती घेऊन घरी गेलो... झोप काही लागली नाही...

अकलूजचे जेष्ठ नेते मोहिते पाटील यांना पत्र लिहिले...
पण राजकीय परिस्थिती पाहता हे काम सामाजिक लोकांनाच करावे लागेल हे लक्षात आले...

चार दोन थोरा मोठ्यांना भेटलो... पण त्यांना इतर बरेच व्याप असल्याने .. फार कोणी काळजी पूर्वक लक्ष दिले नाही ...!!!!!!

बाबा आढावाना पुन्हा व्यक्तीशः भेटायचे ठरवले..
बाबा आढावानी आनदाने पाठींबा दिला ....

तुम्ही तरुण मंडलीनीच हे काम आता पाहायला हवे " अकलूज परिसरातील सर्व सामाजिक शिवप्रेमींना एकत्र करून या दुर्लक्षित शिवकन्येच्या समाधीचा जीर्णोद्धार करा... मी सोबत आहेच .. " असा मोलाचा पाठींबा त्यांनी दिला...

त्या नंतर शाहीर राजेंद्र कांबळे यांची भेट घेतली त्यांनी हि पुढाकार घेण्याचा शब्द दिला...
पंढरपुरचे युवानेते अमरजित पाटील यांनीही सक्रीय पाठींबा दिला आहे.

या नंतर या समाधीचे संशोधक गोपाळराव देशमुख यांना त्यांचे पंढरपुरचे घरी भेटायला गेलो त्यांनी फारच तळमळीने सारी माहिती दिली....

ती मी येथे लिहिणार आहेच ...

 या नंतर मी फलटणच्या शाही समाधीला भेट दिली आणि माळशिरसला जाऊन सखुबाई महादजी निंबाळकर यांची दुर्लक्षित भग्न समाधी हि पहिली..


एकीकडे संगमरवरी शाही निंबालकरी समाध्या आणि दुसरीकडे त्याच घरात दिलेल्या शिवकन्या सखुबाई निंबाळकर यांची भग्न समाधी पाहून


आज हि ब्राह्मणी मानसिकता मराठा समाज्याच्या ऐतिहासिक वारशांचे किती नुकसान करत आहे याची तीव्र जाणीव झाली..
.
या सामाजिक क्रांतीला दडपण्यासाठी त्या समाधीला वाळीत टाकावे !!!!!!!!!!!!!! एवढे दुर्लक्षित करावे कि तेथे अक्षरशः हागणदारी व्हावी !!!!!!!!!!!!!!!!!


वेड्या बाबळीने वेढलेल्या या जेष्ठ शिवकन्येच्या समाधीचा जीर्णोद्धार झालाच पाहिजे .......


हा ऐतिहासिक वारसा असा भग्न होत असताना आपण शिवप्रेमी गप्प बसूच कसे शकतो ????????????


या वेड्या बाबळीने वेढलेल्या भग्न समाधीचा एकही काटा जर आमच्या मनाला टोचत नसेल तर आमची मने पुन्हा एकदा तपासावी लागतील...

आपण काय करू शकतो......

१. आधी येथे प्रातःविधीला बसणाऱ्या लोकांचे प्रबोधन करावे लागेल कि बाबानो हे थांबवा ...
२. या साठी प्रथम त्या जागेच्या मालकांना या समाधीचे महत्व पटून द्यावे लागेल ते काम मी १५ डिसेंबर नंतर करणार आहे..
३. जागेचे मालक हे शिव प्रेमी तसेच सामाजिक जाणीव असणारे आहेत त्या मुळे फार त्रास होणार नाही अशी अपेक्षा आहे.
४. या नंतर त्या जागेवर तर काम्पौंद करावे लागेल आणि एक मोठा माहिती फलक लावावा लागेल..
५. छोटासा प्रबोधन पर कार्यक्रम ठेवावा लागेल.... जन जागृती करावी लागेल..
६. त्या नंतर या जागेची स्वच्छता करावी लागेल.
७. या नंतर जीर्णोद्धारासाठी निधी उभारावा लागेल...
८. येथून पुढे जीर्णोद्धाराची खरी सुरुवाट होईल....

यासाठी समाधी परिसरातील शिवप्रेमींना सहभागी होण्यासाठी प्रबोधन करायचे आहे ते मी करत आहेच ....

संदर्भ  : http://www.orkut.co.in/Main#CommMsgs?cmm=12792978&tid=5540033853785670369&start=1 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उस्मानाबाद की धाराशीव? या शहराचं नाव आलं कुठून?

उस्मानाबाद की धाराशीव? या शहराचं नाव आलं कुठून? प्रणाली येंगडे बीबीसी मराठीसाठी 17 जानेवारी 2021 अपडेटेड 18 जानेवारी 2021 फोटो स्रोत, GETTY IMAGES फोटो कॅप्शन, मीर उस्मान अली खान मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवरून उस्मानाबादचा "धाराशीव" असा उल्लेख झाल्यानं नामांतराचा मुद्दा परत चर्चेत आला आहे. अशावेळी या शहराच्या नावाचा इतिहास आणि त्यामागील राजकारण याविषयी घेतलेला हा संक्षिप्त आढावा. धाराशीव  नावाचा इतिहास धाराशीव या उस्मानाबादच्या पूर्वीच्या नावाविषयी अनेक कथा सांगितल्या जातात. स्कंद पुराणातील एका कथेनुसार, पूर्वी या गावात धारासूर नावाचा एक असुर (राक्षस) राहत असे. त्याच्या नावावरून गावाचे नाव धारासूर म्हणून ओळखले जायचे. धारासूरानं शंकराची आराधना करून प्रचंड शक्तीचं वरदान मिळवलं. त्यानंतर उन्मत्त होऊन त्याने लोकांना त्रास द्यायला सुरवात केली. जेव्हा सरस्वती देवीनं धारासूराचा वध केला तेव्हा तिचं नाव 'धारासुरमर्दिनी' झालं. अशाप्रकारे तिच्या नावावरूनच गावाचं नाव धाराशिव पडल्याची आख्यायिका आहे. औरंगाबादचं नाव आजवर कितीवेळा बदललंय हे तुम्हाला माहिती आहे का? औरंगाब...

अंबाजोगाईत निजाम सरकारच्या खाणाखुणा

नजरिया Home इतिहास अंबाजोगाईत निजाम सरकारच्या खाणाखुणा   Sep 16, 2018 अं बाजोगाई शहराला तसे फार मोठे ऐतिहासिक महत्त्व आहे. पूर्वी हा भाग निजाम संस्थानात असलेल्या हैदराबाद संस्थानात यायचा. त्यावेळी मराठवाडा विभागाला  ‘ मराठवाडी ’  असं  म्हटलं जायचं. हैदराबाद संस्थान काळात अंबाजोगाई शहराला जिल्हयाचा दर्जा होता.  सन १८६०-१९०० या चाळीस वर्षांच्या काळात या शहरात बऱ्याच ऐतिहासिक वास्तू निर्माण झाल्या. यापैकी अनेक देखण्या वास्तू शंभरी पार करुन आजही दिमाखात उभ्या आहेत. अनेक जुन्या वास्तूंच्या ठिकाणी त्याच कार्यालयाच्या नव्या देखण्या इमारती उभ्या आहेत.  मराठवाडा विभागातील जवळपास सर्वच गावात हे चित्र आहे. मात्र ,  अंबाजोगाई त्याकाळी जिल्हा व निजाम सरकारच्या सैन्यदलाचं मुख्य केंद्र होतं. या शहारात निजाम राजवटीतील अनेक वास्तू ,  समाध्या ,  मंदीरे ,  मस्जिद ,  ख्रिश्चन स्मशानभूमी ,  सैन्यदलाची बंकरे अशा अनेक खुणा मराठवाडा मुक्ती संग्रामापूर्वीची साक्ष देत उभ्या आहेत. या ऐतिहासिक वास्तुंचे जतन होण्याची गरज आहे. अंबाजोगाई शहरावर आणि हैदर...

केदारेश्वर मंदिर, धर्मापुरी

केदारेश्वर मंदिर, धर्मापुरी केदारेश्वर मंदिर  हे  महाराष्ट्रातील   बीड जिल्ह्यातील   धर्मापुरी गावाजवळ असलेले मध्ययुगीन  शिवमंदिर  आहे. याचे स्थापत्य  चालुक्य शैलीत  केले आहे. आरंभ  मराठवाडा  परिसर प्राचीन  शिल्प स्थापत्य  अवशेषांनी समृध्द आहे. प्राचीन ऐतिहासिक पुराव्यांचा विचार करत असताना मराठवाड्याला वगळून चालतच नाही. आजही अशा अनेक ऐतिहासिक खाणाखुणा जागोजागी सर्व मराठवाडाभर उभ्या आहेत.  सातवाहनांपासून   यादव  काळापर्यंत येथे अनेक शिल्पस्थापत्य रचना उदयास आल्या. मराठवाड्यावर सर्वप्रथम राज्य सातवाहनांनी केले. प्रतिष्ठाननगरी  ही त्यांची राजधानी होती.  वेरुळच्या कातळातून अखंड काव्य निर्माण करणारा सर्वश्रेष्ठ कलाकार कोकस हा या प्रतिष्ठानचाच. तर या प्रतिष्ठानवर इ.स.पूर्व २३५ पासून ते इ.स. २२५ असे सुमारे साडेचारशे वर्ष सातवाहनोनी राज्य केले. त्यानंतर या मराठवाड्यात इ.स. २२५ ते ५५० असे सुमारे तीनशे वर्ष  वाकाटकांनी  राज्य केले. त्यानंतर इथे बदामीच्या चालुक्यांची सत्ता निर्माण झाली. ती सुमारे दोनशे व...