मुख्य सामग्रीवर वगळा

मराठवाड्यातील दगडाबार्इंची शौर्यगाथा

मराठवाड्यातील दगडाबार्इंची शौर्यगाथा (Dagadabai, an ordinary village woman fought for national cause!)

महाराष्ट्रातील मराठवाडा हा भाग स्वातंत्र्यपूर्व काळात हैदराबादच्या निजामाच्या अखत्यारीत येत होता. देशात इतरत्र लोक परकीयांविरूद्ध लढत असताना मराठवाड्यातील जनतेला स्वकीयांच्या अत्याचाराला तोंड द्यावे लागत होते. स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्रॉफ या स्वातंत्र्यसैनिकांनी मराठवाड्यातील जनतेत त्या विरूद्ध जागृती निर्माण केली. त्या लढ्यात ग्रामीण भागातील एक अतिशय धाडसी महिला सहभागी झाली होती. तिचे नाव होते दगडाबाई देवराव शेळके. जालना जिल्ह्याच्या भोकरदन तालुक्‍यातील कोलते टाकळी हे छोटेसे खेडे म्हणजे दगडाबार्इ यांचे मूळ गाव ! त्यांचे सासर जालना शहरापासून पंधरा-सोळा मैलांवर असलेल्या बदनापूरजवळील धोपटेश्वर येथे होते. दगडाबाई या मुळातच धाडसी स्वभावाच्या होत्या. त्यात त्यांना स्वातंत्र्य लढ्याची जाणीव झाली. त्यांनी तशी जागृती महिलांमध्ये केली. त्यांनी निजामाची सत्ता ही देशविरोधी आहे, त्यामुळे त्यांच्याविरूद्ध लढणे म्हणजे स्वातंत्र्यसंग्रामच आहे ही गोष्ट महिलांना समजावून सांगितली. निजामाच्या शिपायांना रझाकार म्हटले जाई. रझाकार हे शस्त्रसज्ज असत, त्यामुळे त्यांच्याविरूद्ध लढताना शस्त्रांचा वापर केला पाहिजे हे दगडाबार्इ यांनी ओळखले. त्यांनी देऊळगावराजा येथील एका कॅम्पवर जाऊन आधुनिक शस्त्र चालवण्याचे प्रशिक्षण घेतले.

दगडाबार्इंचे धाडस इतके होते, की अनेक जण दिवसाढवळ्यादेखील स्वातंत्र्यसैनिकांना मदत करण्यास घाबरत. पण दगडाबाई रात्री-अपरात्री गावोगाव प्रवास करत व स्वातंत्र्यसैनिकांना मदत करत. दगडाबार्इंसोबत संपत भिल्ल, बाबुराव जाधव, लाला लक्ष्मीनारायण हे लोक होते. त्या सर्वांनी निजामाच्या पोलिस चौक्या जाळणे, अत्याचार करणाऱ्या रझाकारांना प्रत्युत्तर देणे अशी कामे केली. एकदा तर दगडाबार्इंनी कोलते टाकळीच्या त्यांच्या गावात असलेल्या रझाकारांच्या छावणीवर हल्ला केला व तेथील शिपायांना ठार केले. त्या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली. लोक दगडाबाई यांना ‘मर्दानी दगडाबाई’ म्हणू लागले. एकदा, निजाम सरकारच्या सैनिकांनी त्यांना शस्त्रांसह रंगेहाथ पकडले होते. त्यामुळे त्यांना तुरूंगवासही भोगावा लागला होता. त्या पॅण्ट, शर्ट घालून, मुलाला पाठीशी घेऊन बंदूकीसह घोड्यावर प्रवास करत असल्याने कुटुंबीय व समाज यांचाही त्यांना आक्षेप होता. पूर्णत: पुरुषी वर्चस्व असलेल्या मराठवाड्यात त्या लष्करी पोशाख घालून वावरत. त्या खांद्यावर मोठी रायफल, खिशात पिस्तुल, प्रसंगी आणीबाणीची परिस्थिती उद्‌भवली तर बाँब अशा शस्त्रांनिशी सज्ज असत. त्यांना पती देवराव शेळके यांच्या रोषालाही सामोरे जावे लागले होते, परंतु त्या खचल्या नाहीत. त्यांनी त्यांच्या स्वतःच्या जिवाची शाश्वती नाही म्हणून पती देवराव यांचा दुसरा विवाह मैनाबाई नावाच्या स्त्रीशी स्वतःहून लावून दिला होता.

दगडाबार्इंनी त्यांच्या गावात असलेल्या रझाकारांच्या छावणीवर हल्ला केला व तेथील शिपायांना ठार केले.

हसनाबाद गावात एकदा दंगल उसळली होती. गावकरी व रझाकार यांच्यात धुमश्चक्री सुरू होती. तेव्हा दगडाबाई यांनी बरेच मोठे अंतर पोटावर रांगत जाऊन रझाकारांची छावणी गाठली व तेथे गोळीबार केला, त्यात काही रझाकार ठार झाले. रझाकारांनी संपूर्ण हसनाबाद गावाची नाकेबंदी केली, तेव्हा कोणीच पुढे जाण्यास तयार नव्हते. लोकांना त्यांचा मृत्यू समोर दिसत होता. दगडाबाई त्यावेळी मागे हटल्या नाहीत, त्यांनी एकटीने पुन्हा एकदा रझाकारांची छावणी गाठली व त्यावर हातबाँब टाकले. अवघ्या अठरा-वीस वर्षांच्या तरुणीचे ते शौर्य सर्वांनाच चकित करणारे ठरले.

पुढे, भारत देश ब्रिटिशांच्या ताब्यातून मुक्‍त झाला. मराठवाडाही जुलमी निजामी सत्तेपासून मुक्‍त झाला. दगडाबार्इंनी स्वतःला नंतरच्या काळातही समाजकार्यात झोकून दिले. दगडाबार्इंच्या त्या अतुलनीय शौर्याची दखल केंद्र सरकारने घेतली. त्यांचा पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव यांनी मोठा सत्कार केला. त्या चांदवड येथील ‘शेतकरी महिला मेळाव्या’च्या अध्यक्ष होत्या. दगडाबार्इंचा 5 मे 2013 रोजी वयाच्या अठ्ठ्याण्णवव्या वर्षी मृत्यू झाला. त्यांच्यावर धोपटेश्वर येथे शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात आले.

– संतोष खेडलेकर  9822097809 skhedlekar15@yahoo.co.in

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उस्मानाबाद की धाराशीव? या शहराचं नाव आलं कुठून?

उस्मानाबाद की धाराशीव? या शहराचं नाव आलं कुठून? प्रणाली येंगडे बीबीसी मराठीसाठी 17 जानेवारी 2021 अपडेटेड 18 जानेवारी 2021 फोटो स्रोत, GETTY IMAGES फोटो कॅप्शन, मीर उस्मान अली खान मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवरून उस्मानाबादचा "धाराशीव" असा उल्लेख झाल्यानं नामांतराचा मुद्दा परत चर्चेत आला आहे. अशावेळी या शहराच्या नावाचा इतिहास आणि त्यामागील राजकारण याविषयी घेतलेला हा संक्षिप्त आढावा. धाराशीव  नावाचा इतिहास धाराशीव या उस्मानाबादच्या पूर्वीच्या नावाविषयी अनेक कथा सांगितल्या जातात. स्कंद पुराणातील एका कथेनुसार, पूर्वी या गावात धारासूर नावाचा एक असुर (राक्षस) राहत असे. त्याच्या नावावरून गावाचे नाव धारासूर म्हणून ओळखले जायचे. धारासूरानं शंकराची आराधना करून प्रचंड शक्तीचं वरदान मिळवलं. त्यानंतर उन्मत्त होऊन त्याने लोकांना त्रास द्यायला सुरवात केली. जेव्हा सरस्वती देवीनं धारासूराचा वध केला तेव्हा तिचं नाव 'धारासुरमर्दिनी' झालं. अशाप्रकारे तिच्या नावावरूनच गावाचं नाव धाराशिव पडल्याची आख्यायिका आहे. औरंगाबादचं नाव आजवर कितीवेळा बदललंय हे तुम्हाला माहिती आहे का? औरंगाब...

अंबाजोगाईत निजाम सरकारच्या खाणाखुणा

नजरिया Home इतिहास अंबाजोगाईत निजाम सरकारच्या खाणाखुणा   Sep 16, 2018 अं बाजोगाई शहराला तसे फार मोठे ऐतिहासिक महत्त्व आहे. पूर्वी हा भाग निजाम संस्थानात असलेल्या हैदराबाद संस्थानात यायचा. त्यावेळी मराठवाडा विभागाला  ‘ मराठवाडी ’  असं  म्हटलं जायचं. हैदराबाद संस्थान काळात अंबाजोगाई शहराला जिल्हयाचा दर्जा होता.  सन १८६०-१९०० या चाळीस वर्षांच्या काळात या शहरात बऱ्याच ऐतिहासिक वास्तू निर्माण झाल्या. यापैकी अनेक देखण्या वास्तू शंभरी पार करुन आजही दिमाखात उभ्या आहेत. अनेक जुन्या वास्तूंच्या ठिकाणी त्याच कार्यालयाच्या नव्या देखण्या इमारती उभ्या आहेत.  मराठवाडा विभागातील जवळपास सर्वच गावात हे चित्र आहे. मात्र ,  अंबाजोगाई त्याकाळी जिल्हा व निजाम सरकारच्या सैन्यदलाचं मुख्य केंद्र होतं. या शहारात निजाम राजवटीतील अनेक वास्तू ,  समाध्या ,  मंदीरे ,  मस्जिद ,  ख्रिश्चन स्मशानभूमी ,  सैन्यदलाची बंकरे अशा अनेक खुणा मराठवाडा मुक्ती संग्रामापूर्वीची साक्ष देत उभ्या आहेत. या ऐतिहासिक वास्तुंचे जतन होण्याची गरज आहे. अंबाजोगाई शहरावर आणि हैदर...

केदारेश्वर मंदिर, धर्मापुरी

केदारेश्वर मंदिर, धर्मापुरी केदारेश्वर मंदिर  हे  महाराष्ट्रातील   बीड जिल्ह्यातील   धर्मापुरी गावाजवळ असलेले मध्ययुगीन  शिवमंदिर  आहे. याचे स्थापत्य  चालुक्य शैलीत  केले आहे. आरंभ  मराठवाडा  परिसर प्राचीन  शिल्प स्थापत्य  अवशेषांनी समृध्द आहे. प्राचीन ऐतिहासिक पुराव्यांचा विचार करत असताना मराठवाड्याला वगळून चालतच नाही. आजही अशा अनेक ऐतिहासिक खाणाखुणा जागोजागी सर्व मराठवाडाभर उभ्या आहेत.  सातवाहनांपासून   यादव  काळापर्यंत येथे अनेक शिल्पस्थापत्य रचना उदयास आल्या. मराठवाड्यावर सर्वप्रथम राज्य सातवाहनांनी केले. प्रतिष्ठाननगरी  ही त्यांची राजधानी होती.  वेरुळच्या कातळातून अखंड काव्य निर्माण करणारा सर्वश्रेष्ठ कलाकार कोकस हा या प्रतिष्ठानचाच. तर या प्रतिष्ठानवर इ.स.पूर्व २३५ पासून ते इ.स. २२५ असे सुमारे साडेचारशे वर्ष सातवाहनोनी राज्य केले. त्यानंतर या मराठवाड्यात इ.स. २२५ ते ५५० असे सुमारे तीनशे वर्ष  वाकाटकांनी  राज्य केले. त्यानंतर इथे बदामीच्या चालुक्यांची सत्ता निर्माण झाली. ती सुमारे दोनशे व...