मुख्य सामग्रीवर वगळा

पूर्वी दख्खनमधील औरंगाबाद सुभ्यात जुन्नर आणि कोकण हे भाग मोडत होते का? दख्खनचे सहा सुभे कोणते होते?

मुघल काळात प्रांत/राज्यासाठी 'सुभा' (Subah) ही संज्ञा होती. 'सुभा' हा शब्द अरबी आणि पारशी भाषेतून आला आहे. सुभ्याचा प्रमुख 'सुभेदार' म्हणून ओळखला जात असे. सोळाव्या शतकात मुघल शासकांनी प्रशासनाच्या सोयीसाठी आणि प्रभावी नियंत्रणासाठी सुभ्यांची विभागणी प्रशासकीय विभागात केली होती. उदा. सरकार (District- जिल्हा), परगणा (Pargana- लहान विभाग) आणि कसबा (Qasba/Mauza- छोटे खेडे).

मुघल बादशहाचा प्रतिनिधी म्हणून निजामाने दख्खनमध्ये देखील ह्याच पद्धतीचे/आकृतीबंधाचे पालन केले. हैदराबाद राज्याचा कितीतरी भाग मराठ्यांच्या किंवा इंग्रजांच्या ताब्यात गेला. तरी १८६४ पर्यंत कागदोपत्री पूर्वीचे सुभे म्हणजे प्रांत आणि सरकार म्हणजे जिल्हे यांचा उल्लेख केला जात असे.

त्याकाळी मराठवाड्याचा भाग दोन ते तीन सुभ्यात तसेच जुन्नर आणि कोकण हे भाग औरंगाबाद सुभ्यात मोडत, हे वाचून आपल्याला आश्चर्य वाटेल!

निजाम-उल-मुल्क हा दख्खनचा व्हाईसरॉय असतानाच्या काळात दख्खनमधील सुभ्यांची एकूण संख्या सहा होती.

हे सहा सुभे खालीलप्रमाणे होते.-

१. औरंगाबाद (Khusjistabunyad)

२. खानदेश (Khandesh)

३. वऱ्हाड (Berar)

४. बिदर (Muhammadabad)

५. विजापूर (Darul-Zafar)

६. हैदराबाद (Farkhundabunyad)

▪️सुभे औरंगाबादमध्ये दौलताबाद, अहमनगर, पैठण, परंडा, बीड, जालना, संगमनेर, फत्तेहाबाद धारूर, सोलापूर, जुन्नर, तळकोकण, जव्हार हे सरकार किंवा जिल्हे येत होते.

▪️सुभे खानदेशमध्ये सहा सरकार म्हणजे जिल्हे होते. यामध्ये असीरगड, बिजागडखरगोण, बागलाण, कालणा, नंदुरबार, हंडिया यांचा समावेश होता.

▪️सुभे वऱ्हाड या सुभ्यात पाथरी, मेहकर, बेनालवाडी, पाईनघाट/गाविलगड, कळंब, खेडला, नरनाळा, पूर्णा, देवगड, शिरपूर या जिल्ह्यांचा समावेश होता.

▪️सुभे बिदर या सुभ्यात बिदर, कल्याणी, मलखेड, यादगीर हे जिल्हे होते.

▪️सुभे विजापूरमध्ये गुलबर्गा, तळगाव, असदनगर, अधोनी, बंकापूर, तोरगल, रायबाग, गाजीपूर, नळदुर्ग, मुद्गल, मुस्तफाबाद, नुसरताबाद, पन्हाळा वगैरे जिल्ह्यांचा समावेश होता.

▪️सुभे हैदराबादमध्ये आंध्र आणि तामिळनाडूमधील भागांचा समावेश असे.

निजाम-उल-मुल्क आसफ जाह पहिला हा मुघल दख्खनचा तीन वेळा प्रांतीय गव्हर्नर होता. पहिल्यांदा १७१३ ते १७१५ पर्यंत, नंतर १७२० ते १७२२ पर्यंत आणि पुन्हा १७२४ ते १७४८ म्हणजे त्याच्या मृत्यूपर्यंत. निजाम-उल-मुल्कच्या मृत्यूच्या वेळी मुघल दख्खनचे प्रादेशिक अधिकार क्षेत्र त्रिचीनोलीच्या किल्ल्यापर्यंत (Fort of Trichinoaly) होते आणि त्यामध्ये वर उल्लेख केलेल्या सहा सुभ्यांचा समावेश होता.

तळटीपा

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उस्मानाबाद की धाराशीव? या शहराचं नाव आलं कुठून?

उस्मानाबाद की धाराशीव? या शहराचं नाव आलं कुठून? प्रणाली येंगडे बीबीसी मराठीसाठी 17 जानेवारी 2021 अपडेटेड 18 जानेवारी 2021 फोटो स्रोत, GETTY IMAGES फोटो कॅप्शन, मीर उस्मान अली खान मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवरून उस्मानाबादचा "धाराशीव" असा उल्लेख झाल्यानं नामांतराचा मुद्दा परत चर्चेत आला आहे. अशावेळी या शहराच्या नावाचा इतिहास आणि त्यामागील राजकारण याविषयी घेतलेला हा संक्षिप्त आढावा. धाराशीव  नावाचा इतिहास धाराशीव या उस्मानाबादच्या पूर्वीच्या नावाविषयी अनेक कथा सांगितल्या जातात. स्कंद पुराणातील एका कथेनुसार, पूर्वी या गावात धारासूर नावाचा एक असुर (राक्षस) राहत असे. त्याच्या नावावरून गावाचे नाव धारासूर म्हणून ओळखले जायचे. धारासूरानं शंकराची आराधना करून प्रचंड शक्तीचं वरदान मिळवलं. त्यानंतर उन्मत्त होऊन त्याने लोकांना त्रास द्यायला सुरवात केली. जेव्हा सरस्वती देवीनं धारासूराचा वध केला तेव्हा तिचं नाव 'धारासुरमर्दिनी' झालं. अशाप्रकारे तिच्या नावावरूनच गावाचं नाव धाराशिव पडल्याची आख्यायिका आहे. औरंगाबादचं नाव आजवर कितीवेळा बदललंय हे तुम्हाला माहिती आहे का? औरंगाब...

अंबाजोगाईत निजाम सरकारच्या खाणाखुणा

नजरिया Home इतिहास अंबाजोगाईत निजाम सरकारच्या खाणाखुणा   Sep 16, 2018 अं बाजोगाई शहराला तसे फार मोठे ऐतिहासिक महत्त्व आहे. पूर्वी हा भाग निजाम संस्थानात असलेल्या हैदराबाद संस्थानात यायचा. त्यावेळी मराठवाडा विभागाला  ‘ मराठवाडी ’  असं  म्हटलं जायचं. हैदराबाद संस्थान काळात अंबाजोगाई शहराला जिल्हयाचा दर्जा होता.  सन १८६०-१९०० या चाळीस वर्षांच्या काळात या शहरात बऱ्याच ऐतिहासिक वास्तू निर्माण झाल्या. यापैकी अनेक देखण्या वास्तू शंभरी पार करुन आजही दिमाखात उभ्या आहेत. अनेक जुन्या वास्तूंच्या ठिकाणी त्याच कार्यालयाच्या नव्या देखण्या इमारती उभ्या आहेत.  मराठवाडा विभागातील जवळपास सर्वच गावात हे चित्र आहे. मात्र ,  अंबाजोगाई त्याकाळी जिल्हा व निजाम सरकारच्या सैन्यदलाचं मुख्य केंद्र होतं. या शहारात निजाम राजवटीतील अनेक वास्तू ,  समाध्या ,  मंदीरे ,  मस्जिद ,  ख्रिश्चन स्मशानभूमी ,  सैन्यदलाची बंकरे अशा अनेक खुणा मराठवाडा मुक्ती संग्रामापूर्वीची साक्ष देत उभ्या आहेत. या ऐतिहासिक वास्तुंचे जतन होण्याची गरज आहे. अंबाजोगाई शहरावर आणि हैदर...

केदारेश्वर मंदिर, धर्मापुरी

केदारेश्वर मंदिर, धर्मापुरी केदारेश्वर मंदिर  हे  महाराष्ट्रातील   बीड जिल्ह्यातील   धर्मापुरी गावाजवळ असलेले मध्ययुगीन  शिवमंदिर  आहे. याचे स्थापत्य  चालुक्य शैलीत  केले आहे. आरंभ  मराठवाडा  परिसर प्राचीन  शिल्प स्थापत्य  अवशेषांनी समृध्द आहे. प्राचीन ऐतिहासिक पुराव्यांचा विचार करत असताना मराठवाड्याला वगळून चालतच नाही. आजही अशा अनेक ऐतिहासिक खाणाखुणा जागोजागी सर्व मराठवाडाभर उभ्या आहेत.  सातवाहनांपासून   यादव  काळापर्यंत येथे अनेक शिल्पस्थापत्य रचना उदयास आल्या. मराठवाड्यावर सर्वप्रथम राज्य सातवाहनांनी केले. प्रतिष्ठाननगरी  ही त्यांची राजधानी होती.  वेरुळच्या कातळातून अखंड काव्य निर्माण करणारा सर्वश्रेष्ठ कलाकार कोकस हा या प्रतिष्ठानचाच. तर या प्रतिष्ठानवर इ.स.पूर्व २३५ पासून ते इ.स. २२५ असे सुमारे साडेचारशे वर्ष सातवाहनोनी राज्य केले. त्यानंतर या मराठवाड्यात इ.स. २२५ ते ५५० असे सुमारे तीनशे वर्ष  वाकाटकांनी  राज्य केले. त्यानंतर इथे बदामीच्या चालुक्यांची सत्ता निर्माण झाली. ती सुमारे दोनशे व...